Advertisement

coronavirus update: कोरोना अजूनही तिसऱ्या टप्प्यात पोहोचलेला नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा दावा

आतापर्यंत १२० कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे, हे सांगतानाच महाराष्ट्रात अजूनही कोरोना तिसऱ्या टप्प्यात पोहोचलेला नाही.

coronavirus update: कोरोना अजूनही तिसऱ्या टप्प्यात पोहोचलेला नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा दावा
SHARES

राज्यात रुग्णांची संख्या वाढत असली, तरी दुसरीकडे रुग्ण बरे होऊन त्यांना घरी देखील सोडण्यात येत आहे. आतापर्यंत १२० कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे, हे सांगतानाच महाराष्ट्रात अजूनही कोरोना तिसऱ्या टप्प्यात पोहोचलेला नाही. याबाबत आयसीएमआर (ICMR) आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) तसं घोषित केलं जातं, असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी केला.

महाराष्ट्र राज्यातील कोरोना बाधित संख्या 1297 झाली आहे. यामध्ये मुंबई 143, पुणे 03,पिंपरी चिंचवड 02, यवतमाळ 01, औरंगाबाद 03, ठाणे 01,नवी मुंबई 02, कल्याण-डोंबिवली 04,मीरा-भाईंदर 01,वसई विरार 01,सिंधुदुर्ग 01,अशी 162 रुग्णांची वाढ झाली आहे. 

हेही वाचा - कोरोनाचा मृत्यूदर महाराष्ट्रात दुप्पट

रक्षक क्लिनिक सुरू करणार

कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असतानाच राज्यभरात ठिकठिकाणी बंद असलेले खासगी दवाखाने सुरू व्हावेत यासाठी आरोग्यमंत्री टोपे यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (indian medical asociation) पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आयएमएच्यावतीने (IMA) शहरी भागात मोबाईल आणि कम्युनिटी क्लिनिक तर ग्रामीण भागात रक्षक क्लिनिक (rakshak clinics) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

सुरक्षेची हमी

या क्लिनिकमध्ये ओपीडी सुरू करण्यात येईल. राज्य शासनाकडून डॉक्टरांच्या सुरक्षेची आवश्यक ती साधने पुरविण्यात येईल, अस आश्वासन यावेळी आरोग्यमंत्र्यांनी आयएमएला दिलं. कोरोनाच्या संकटकाळात सामान्य जनतेला खासगी रुग्णालयातूनही उपचार मिळावे, अशी अपेक्षा यावेळी आरोग्यमंत्र्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली.

हेही वाचा - ८२ वर्षीय महिलेची कोरोनावर मात

मास्क वापरणं बंधनकारक

मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जिथं जास्त रुग्ण आढळून येत आहेत, तिथं नागरिकांना मास्क वापरणं बंधनकारक करावं, असं सांगतानाच मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरण्याचं बंधनकारक केल्याचे त्यांनी सांगितलं. मुंबईतील धारावी (dharavi) भागात लॉकडाऊन प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता असून सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचंही ते म्हणाले.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा