Advertisement

भारतातील पहिल्या मोबाईल लॅबचं उद्घाटन, होणार अधिक चाचण्या

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी याच दिशेनं पाऊल उचलत एक मोबाईल लॅब लाँच केली आहे.

भारतातील पहिल्या मोबाईल लॅबचं उद्घाटन, होणार अधिक चाचण्या
SHARES

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना सरकार टेस्टिंगचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी याच दिशेनं पाऊल उचलत एक मोबाईल लॅब लाँच केली आहे. ही मोबाईल लॅब कोरोना टेस्टिंगमध्ये कामाला येईल.

लॅब कोणत्याही भागात जाऊन टेस्टिंग करेल. या मोबाईल लॅबमध्ये दररोज आरटी-पीसीआर तंत्रज्ञानानं २५ आणि ईएलआयएसए तंत्राद्वारे २०० कोरोना टेस्ट होतील. याशिवाय टीबी आणि एचआयव्ही संबंधित देखील काही टेस्ट होतील.

सरकारनुसार, इथं लॅबची सुविधा नाही अशा ठिकाणी या मोबाईल लॅबला घेऊन जाणार आहे. म्हणजे गाव-दुर्गम भागात टेस्टिंगसाठी या मोबाईल लॅबचा उपयोग करता येईल. या दरम्यान डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, देशात फेब्रुवारीमध्ये केवळ 1 लॅब होती. मात्र आता आपल्याकडे ९५३ लॅब आहेत. यातील जवळपास ७०० सरकारी लॅब आहेत. त्यामुळे टेस्टिंग जास्त होतील. मोबाईल लॅबबद्दल त्यांनी सांगितलं की, दुर्गम भागात याचा टेस्टिंगसाठी वापर होईल.

दरम्यान, देशात आतापर्यंत कोरोनाचे 63 लाख टेस्टिंग झाले आहेत. दररोज 3 लाख टेस्टचे आयसीएमआरचे लक्ष्य आहे.



हेही वाचा

पॉझिटिव्ह रिपोर्ट रुग्णांना सांगू नका, पालिकेच्या नियमावर मनसे नाराज

मुंबईतल्या 'या' रुग्णालयातला आॅक्सिजनचा पुरवठा वाढवला

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा