मुंबईत कोरोना मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. मृत्यू झालेला रुग्ण कुठल्याही भागातील असला तरी त्याचे अंत्यसंस्कार जवळच्या स्मशानभूमीत केले जातात. महापालिकेची बहुतांश मोठी रुग्णालयं मुंबईत आहेत. त्यामुळं अनेक मृतदेह शिवाजी पार्क स्मशानभूमीत आणले जात आहेत.
दिवसाला २५ ते ३० अंत्यविधी शिवाजी पार्क स्मशानभूमी होत आहेत. त्यामुळे येथील प्रदूषण वाढलं असून त्वचा विकार व श्वसनाचे आजार वाढले असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. त्यामुळे दादर बाहेरील मृत्यदेहांवर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यावर आक्षेप घेऊन स्थानिक नागरीक रस्त्यावर उतरले. प्रशासन स्थानिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचा त्रागाही यावेळी व्यक्त करण्यात आला.
हेही वाचा -
Coronavirus Updates: मुंबईतील 'इतक्या' इमारती पुन्हा पुर्वरत
कोरोना मृतांमध्ये ५० वर्षांवरील सर्वाधिक रुग्ण