प्रत्येक मानवी शरीराला जेवणासोबत पाण्याची गरज भासते. एका वेळेस माणूस न जेवता राहू शकतो. पण, पाण्याशिवाय जास्त काळ तो जीवंत राहील याची शक्यता खूप कमी असते.
पाणी दर दिवशी 5 ते 6 लीटर पिणे गरजेचे आहे. त्यासोबत आहारही योग्य प्रमाणात घ्यावा असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तुमच्या लघवीचा रंग तुम्ही किती पाणी पिता यावर अवलंबून असतो.
प्रत्येक माणसाच्या शरीराला 2300 मिलीग्रॅम सोडियमची आवश्यकता असते. त्यामुळे पाण्यासोबत शरीरात सोडियमची देखील तेवढीच गरज भासते. पण, जर तुमचे वयोवर्ष जास्त असेल किंवा तुम्हाला मधुमेह आणि रक्तदाबासारखे आजार असतील तर तुम्ही दिवसाला फक्त 1500 मिलीग्रॅम सोडियमचे सेवन करायला हवे.
कमी प्रमाणात मीठ आणि जास्त प्रमाणात पाणी पिणे हे शरीरासाठी घातकही होऊ शकते. जास्त पाणी प्यायल्याने ‘हायपोनाट्रामिया’ हा आजार होण्याची शक्यता असते. जास्त पाणी प्यायल्यामुळे शरीरातील सोडियम पाण्यात विरघळून जाते. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला फिट येऊ शकते, तो कोमात जाऊ शकतो, किंवा प्रसंगी त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो, असे डॉक्टरांचे मत आहे.
हेही वाचा -
ऑफिसमध्येही राहायचंय फिट, तर वाचा 'या' ८ टिप्स !
हळदीचे पाणी रोज सेवन केल्याचे ११ फायदे