मागील अनेक वर्षांपासून आरोग्य विभागात अनेक पदं रिक्त आहेत. कोरोना व्हायरसच्या
संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने ही रिक्त पदं भरण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरती प्रक्रिया थेट वॉक इन इंटरव्ह्यू पद्धतीने होणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेत आरोग्य विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस राबत आहे. कोरोनाचं संकट मोठं आहे आणि त्याचा सामना करणारी यंत्रणा तोकडी पडत आहे. त्यामुळे ही पदं लवकरात लवकर भरली जाणार आहेत.
,आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दुजोरा दिला आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मी या विषयाचा पाठपुरावा करत होतो. विधानसभेतही मी याबाबत आश्वासन दिलं होतं. नर्सेस, मल्टिपर्पज वर्कर, टेक्निशियन, डॉक्टर यांचा या भरती प्रक्रियेत समावेश असतील. भरती प्रक्रियेदरम्यान गर्दी केली जाणार नाही. यासाठी रांगा नसतील. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या विशेषाधिकाराच्या माध्यमातून शिस्तबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा -
भीतीनं सिलिंडर बुक करण्याची गरज नाही- इंडियन ऑईल
Bombay IITकडून अॅपची निर्मिती, 'क्वॉरन्टाईन' व्यक्तींवर ठेवणार लक्ष