Advertisement

उन्हाळा आला, तब्येत सांभाळा !


उन्हाळा आला, तब्येत सांभाळा !
SHARES

मुंबई - यंदा उन्हाळ्याची तीव्रता सर्वाधिक असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे यंदा नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागणार आहेत. ‘उन्हाळा आला आरोग्य सांभाळा’ असे म्हणत उष्माघातापासून नागरिकांच्या बचावासाठी शासकीय स्तरावर विविध उपाययोजना करण्यासंदर्भात आदेश सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना देण्यात आलेत. अल-निनोच्या प्रभावामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ्याची सुरुवात लवकर झालीय. त्यामुळे उष्णतेच्या लाटेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये, यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुहास दिवसे यांनी परिपत्रक काढून दिले आहेत.

जागोजागी पाणपोई उभारणे, उन्हापासून संरक्षणासाठी रस्त्याच्या दुतर्फा ठिकठिकाणी शेड उभारणे, जिल्हा नियंत्रण कक्ष, महानगरपालिका नियंत्रण कक्ष, विभागीय स्तरावरील नियंत्रण कक्ष, स्थानिक संस्था आणि आरोग्य विभागाने एकत्रित कार्य करणे. तसेच उष्माघातापासून बचावाबाबत जनजागृती कार्यक्रम राबवण्याच्या सुचनाही परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी घ्यायची खबरदारी

शक्यतो सूती कपड्यांचा वापर करा

घरा बाहेर पडताना गॉगल्स, छत्री, टोपी आदींचा वापर करावा

भरपूर पाणी प्यावे

शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी लस्सी, लिंबू पाणी, ताक आदी पेयांचे सेवन करावे

कोणत्या गोष्टी टाळाव्यात 

दुपारी 12 ते 3.30 या काळात घराबाहेर पडणे टाळावे

दुपारच्या वेळेत शारिरीक कष्टाची कामे टाळावीत

उन्हाळ्यात गृहिणींनी स्वयंपाक घराची दारे खिडक्या उघड्या ठेवाव्यात

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा