कोरोनाच्या दोन डोसमध्ये (gap between the first and second doses) किमान २८ दिवसांचं म्हणजे ४ आठवड्यांचं अंतर असतं. पण आता हे अंतर वाढवण्यात आलं आहे. आता कोरोना लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर ४ नाही तर १२ ते १६ आठवड्यांपर्यंत तुम्हाला कोरोना लशीचा दुसरा डोस घेता येईल. पण हा नियम फक्त कोविशिल्ड (Covishiled) कोरोना लशीसाठीच लागू असेल.
सीरम इ्नस्टि्यूटच्या कोविशिल्ड कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवावं अशी शिफारस सरकारच्या नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोव्हिड 19 (NEGVAC) या समितीनं केली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही शिफारस मान्य केली आहे.
Gap between 2 doses of #CovishieldVaccine has been increased to 12-16 weeks from 6-8 weeks currently.
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) May 13, 2021
Decision has been taken based on recommendations given by COVID working group after analysing emerging evidence.@PMOIndia @MoHFW_INDIA #Unite2FightCorona pic.twitter.com/kRbbjxGKSJ
त्यानुसार कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांनी वाढवून १२ ते १६ आठवडे करण्यात आलं आहे. याचा अर्थ पहिला डोस घेतल्यानंतर एका महिन्याने नव्हे तर ३ ते ४ महिन्यांदरम्यान तुम्ही कधीही दुसरा डोस घेऊ शकता.
लसीकरणानंतर काही जणांना साइड इफेक्ट्स (Side Effects) जाणवतात. अशा व्यक्तींचा अभ्यास आणि त्यांना मदत करण्यासाठी एक राष्ट्रीय समिती तयार करण्यात आली आहे. त्या समितीचे एक सदस्य डॉ. एन. के. अरोरा यांनी याबद्दल 'टाइम्स ऑफ इंडिया'ला माहिती दिली.
'लशीचा पहिला डोस घेतलेल्या अनेक व्यक्तींचा दुसरा डोस लांबणीवर पडला आहे, याची आम्हाला कल्पना आहे. मात्र त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. कोविशिल्ड (Covishield) किंवा कोव्हॅक्सिन (Covaxin) या लशींच्या दोन डोसमध्ये (लशीनुसार) ४ ते ६ आठवड्यांचं अंतर असणं अपेक्षित असतं.
मात्र ते ८ ते १० आठवड्यांपर्यंत लांबलं, तरी काहीही फरक पडत नाही. एवढ्या अंतरानं दुसरा डोस घेतला, तरी तो प्रभावीच ठरतो. दोन डोसमधलं अंतर वाढलं तरी पुन्हा पहिला डोस घेणं गरजेचं नाही,' असं डॉ. अरोरा यांनी सांगितलं.
इंटरनॅशनल पेडिअॅट्रिक असोसिएशनचे कार्यकारी संचालक आणि गुजरात कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. नवीन ठाकर यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, 'लस कोणतीही असली, तरी दोन डोसमधला कालावधी जास्त असलेलं बऱ्याच जणांसाठी चागलं ठरतं. थोडक्यात सांगायचं तर, उशीर झाला म्हणून कोणीही दुसरा डोस घ्यायचं टाळू नये. उशीर झाला तरी पहिला डोस पुन्हा घ्यावा लागत नाही.'
हेही वाचा