दिवाळी म्हटलं की फटाके आलेच. पण, या फटाक्यांच्या धुरामुळे वातावरणातील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. कारण, फटाक्यांच्या निर्मितीसाठी दारूचा वापर केला जातो.
शिवाय, फटाके फोडल्यानंतर कॉपर, झिंक, सोडियम, पोटॅशिअम अशा नष्ट न होणाऱ्या रासायनिक तत्वांचं उत्सर्जन होतं. जे मानवी शरीरासाठी घातक आहे. यातून दमा, डोकेदुखी, रक्तदाब, त्वचारोग आणि डोळ्यांचे आजार होऊ शकतात.
फटाक्यांचा त्रास दिवाळीत दमेकऱ्यांना जास्त होतो. त्यामुळेच या दिवाळीत दमेकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? याविषयी ‘मुंबई लाइव्ह’ने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काय करावं? आणि काय करु नये? याचा सल्ला दिला आहे.
जर एखाद्या व्यक्तीला अस्थमाचा अटॅक आला, तर तो त्रास आणखी वाढतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सतत पंपिंग स्प्रे आपल्यासोबत ठेवावा, असा सल्लाही डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी दिला आहे.
श्वासनलिकेवर सूज आल्यामुळे अथवा मोकस (mucus-एक चिकट पदार्थ) जास्त प्रमाणात स्त्रवण झाल्यामुळे श्वासनलिकेचा मार्ग अरुंद होऊन श्वासोच्छ्वास प्रक्रिया त्रासदायक होते. काही व्यक्तींना ठराविक पदार्थांची अॅलर्जी असते. अशा पदार्थांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना दमा होऊ शकतो.
हेही वाचा