शुक्रवार, २८ जानेवारी रोजी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिकमधील दुर्गम आदिवासी गावात एका पुलाचे उद्घाटन केले. गावात, शेंद्रीपाडा येथे, लोक पूर्वी बांबूच्या तात्पुरत्या पुलांचा वापर करत होते जे त्यांच्यासाठी धोकादायक होता.
आदित्य ठाकरेंनी शेंद्रेपाडा इथल्या आदिवासी पाड्यातील पेयजल योजनेचं उद्घाटन करत गावच्या महिलांना हांड्याने पाणी भरून दिले. विशेष म्हणजे या गावात आयोजित कार्यक्रमात मंचावरील खुर्च्यांवर न बसता आदिवासी बांधवांसोबत खाली जमिनीवर बसत त्यांच्याशी त्यांनी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या.
Maharashtra Minister Aaditya Thackeray today inaugurated a bridge in Shendripada, a remote tribal village in Nashik, where people used a makeshift bamboo bridge risking their lives. He also inaugurated a tap water project in the village and had a discussion with the local women. pic.twitter.com/Id2UCU4eae
— ANI (@ANI) January 28, 2022
आदित्य ठाकरे म्हणाले, "आम्ही तुमची माफी मागितली पाहिजे की आतापर्यंत या गोष्टी झाल्या नाहीत. शहरीकरण वाढत असताना राज्यातील अजूनही काही भाग असा आहे की जिथं साध्या सुविधाही पोहचल्या नाहीत. या ठिकाणी लोखंडी पूल बांधण्यात आला. पुढच्या तीन महिन्यात 13 पाड्यांवर घरोघरी पाणी देणार."
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, "तुम्ही अनवाणी चालत असता. इथल्या रस्त्यांवर दगड-गोटे असतात. मीडियानं अशा व्यथा आमच्याकडे पोहोचवाव्यात. पर्यावरण मंत्री म्हणून काम करताना मला अभिमान वाटतो, या सर्व गोष्टी अनुभवायला मिळतात."
आरे जंगलातील आदिवासी पाडे मुख्यमंत्री साहेबांनी वाचवले. या ठिकाणी मी मार्गदर्शन नाही करायला आलो तुमचे आशीर्वाद घ्यायला आलो असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा