Advertisement

पावसाळ्यात रस्त्यावर खड्डा दिसल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई, नवी मुंबई पालिका आयुक्तांचा इशारा

पावसाळ्यात खड्ड्यांमुळे लोकांची गैरसोय होता कामा नये व खड्ड्याची तक्रार येता कामा नये याची दक्षता घेण्याचेही त्यांनी आदेश दिले आहेत.

पावसाळ्यात रस्त्यावर खड्डा दिसल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई, नवी मुंबई पालिका आयुक्तांचा इशारा
(Representational Image)
SHARES

पावसाळ्यात  रस्ते सुस्थितीत असणे हे सर्वात महत्वाचं आहे. रस्त्यांवर एकही खड्डा असता कामा नये यासाठी आतापासूनच सतर्क राहून आपापल्या विभागातील मोठ्या व लहान अशा सर्व रस्त्यांची काटेकोर पाहणी करावी व त्वरीत रस्ते दुरुस्ती करावी असे निर्देश नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. पावसाळ्यात रस्त्यावर खड्डा दिसल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे. 

पावसाळ्यात खड्ड्यांमुळे लोकांची गैरसोय होता कामा नये व खड्ड्याची तक्रार येता कामा नये याची दक्षता घेण्याचेही त्यांनी आदेश दिले आहेत. पावसाळी पूर्व कामांचा विस्तृत आढावा घेण्यासाठी  विशेष बैठकीत आयोजीत केली होती. यावेळी आयुक्त अभिजीत बांगर यांनी परिमंडळ १ चे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, शहर अभियंता संजय देसाई यांच्याकडून पावसाळापूर्व कामांची सविस्तर माहिती घेतली. रस्ते खोदाईशी संबंधीत कोणतीही कामे १५ मे पर्यंत पूर्ण करावीत व ३१ मे पर्यंत डागडुजी करून रस्ते पूर्ववत करावेत. तसंच नाले व गटारे सफाई २५ मे पर्यंत पूर्ण करावी असे आदेश यावेळी आयुक्तांनी दिले. 

पावसाळी कालावधीत कोणतीही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल अशी स्पष्ट समज देत आयुक्तांनी कोणतीही घटना घडल्यावर त्यावर उपाययोजना करण्यापेक्षा त्या आधीच दुर्घटना घडू नयेत म्हणून सतर्कतेने आवश्यक ती दक्षता घ्यावी असे निर्देश अभियांत्रिकी आणि स्वच्छता विभागास दिले. .  

नवी मुंबई शहरातील काही भाग समुद्र पातळीपासून खाली असल्यामुळे मोठी भरती असताना अतिवृष्टी झाल्यास शहराच्या काही भागात पाणी साचते हे लक्षात घेऊन त्याठिकाणी आवश्यक क्षमतेचे पाणी उपसा पंप पुरेशा संख्येने उपलब्ध करून ठेवावेत असं आयुक्तांनी सूचित केले. त्याचप्रमाणे होल्डींग पॉँडवरील फ्लॅप गेटची दुरुस्ती, पंपींग स्टेशनमधील आवश्यक बाबींची पुर्तता, अतिरिक्त पंप व्यवस्था, तेथील विद्युत पुरवठ्यासाठीची पर्यायी व्यवस्था, अंडरपासमध्ये पाणी साठण्याच्या संभाव्य ठिकाणी पंप व्यवस्था, धोकादायक विद्युत खांबे आधीच काढून टाकण्याची कार्यवाही, महानगरपालिकेच्या इमारतींची आवश्यक दुरुस्ती, मोरबे धरण प्रकल्पस्थळी पावसाळ्याच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही अशी विविध बाबींकडे बारकाईने लक्ष देत आवश्यक कार्यवाही २५ मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

सुरु असलेली पावसाळीपूर्व कामे विहित वेळेत पूर्ण होतील याकडे काटेकोर लक्ष द्यावे असे निर्देशित करतानाच झालेल्या कामांचा आढावा पुन्हा एकदा घेणार असल्याचे सूचित करीत आयुक्त अभिजीत बांगर यांनी काही भागांतील कामाची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचंही स्पष्ट केलं.



हेही वाचा

मास्कविना फिरणाऱ्यांकडून ५४ कोटींचा दंड वसूल

मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा