मुंबई - सद्गुरू श्री परमपूज्य स्वामी आनंदजी महाराज म्हणतात की, जर पैशांची चणचण जास्त भासत असेल, गरजेपुरते पैसेही जवळ टिकत नसतील तर एक सोपा उपाय आहे. दर शनिवारी एका सुकलेल्या नारळाला छिद्र पाडून त्यात सुका मेवा आणि वाटलेली साखर टाकून तो नारळ पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली सुरक्षितरित्या ठेवावा. जेणेकरून किडे आणि किटकांना आहार मिळू शकेल. यामुळे सर्व आर्थिक अडचणी तर दूर होतीलच, शिवाय तुमचं जीवनही बदलून जाईल.