वडाळा - ओम श्री साईनाथ सेवा मंडळाच्या वतीनं बुधवारी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. हे मंडळ भाऊबीजेनंतर पहिल्या बुधवारी पदयात्रा काढते. दरवर्षी साई पालखीचा मान म्हणून ही पालखी माटुंगा येथील मरुबाई गांवदेवी मंदिरात ठेवली जाते. त्यानंतर प्रसादाचं वाटप केलं जातं. गेल्या 27 वर्षांपासूनची ही परंपरा आहे. यामध्ये महिला आणि तरुणांचाही सहभाग असतो, असं पालखी प्रमुख निरंजन भामाईकर यांनी सांगितलं.