बॉलिवूडमध्ये आपला दबदबा निर्माण करणारा सगळ्यांचा लाडका मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखच्या मराठी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच रितेश 'माऊली' या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
२०१४ साली आलेला 'लय भारी' हा रितेशचा पहिला मराठी चित्रपट होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. 'लय भारी' या चित्रपटातील 'संग्राम...हा हात लक्षात ठेव' हा डायलॉग फेमस झाला होता. यानंतर रितेशने मराठी चित्रपटात काम केलं नाही. पण रितेशची निर्मिती असलेल्या 'फास्टर फेणे'ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.
आता तब्बल चार वर्षांनंतर रितेश मराठी चित्रपट घेऊन येत आहे. माऊली चित्रपटाची निर्मिती रितेश आणि पत्नी जेनेलिया यांच्या मुंबई फिल्म कंपनीने केली आहे. तर पटकथा क्षितीज पटवर्धन याची आहे. दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे.
A new journey begins...
— Riteish Deshmukh (@Riteishd) April 30, 2018
‘माऊली’
Produced by @Geneliad @mfc Mumbai Film Company
Directed by @AdityaSarpotdar
Written by @Kshitij_P
तो येतोय.....#MAULI #MarathiFilm #ShootBegins pic.twitter.com/EcDDnZCZbk
हेही वाचा