Advertisement

पहिल्यांदाच केलं मोटिव्हेशनल साँग- चिनार-महेश

फिल्मफिनिटी प्रॉडक्शनचे बी. एस. बाबू निर्मित आणि आशिष भेलकर दिग्दर्शित '३१ दिवस' सिनेमा २० जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचं संगीत चिनार-महेश या संगीतकार जोडीनं दिलं आहे. मनाचा ठाव घेणारी तसंच थिरकायला लावणारी गाणी या सिनेमात आहेत.

पहिल्यांदाच केलं मोटिव्हेशनल साँग- चिनार-महेश
SHARES

‘३१ दिवस’ असं उत्कंठावर्धक शीर्षक असलेल्या आगामी मराठी सिनेमाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला. छोट्या पडद्यावरील ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील श्री या व्यक्तिरेखेमुळे लोकप्रिय झालेल्या शशांक केतकरने या सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे.

फिल्मफिनिटी प्रॉडक्शनचे बी. एस. बाबू निर्मित आणि आशिष भेलकर दिग्दर्शित '३१ दिवस' सिनेमा २० जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचं संगीत चिनार-महेश या संगीतकार जोडीनं दिलं आहे. मनाचा ठाव घेणारी तसंच थिरकायला लावणारी गाणी या सिनेमात आहेत.


गाणी करण्याचं स्वातंत्र्य

संगीताबाबत चिनार-महेश म्हणाले की, सिनेमाची गाणी सुंदर होण्याचं विशेष कारण म्हणजे दिग्दर्शक आशिष भेलकर यांनी दिलेलं सिनेमाच्या कथेचं नेमकं नॅरेशन आणि गाणी करण्याचं स्वातंत्र्य. या सिनेमात एकूण ४ गाणी आहेत. त्यापैकी ३ गाणी लवकरच प्रेक्षकांसमोर येतील. एक गाणं सिनेमाचा टर्निग पॉईंट असल्यानं मोठ्या पडद्यावरच पाहणं योग्य राहील. चिनार-महेश म्हणाले की, आवर्जून सांगायचं म्हणजे, या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मोटिव्हेशनल साँग कारण्याचा योग आला. अचानक आलेल्या अडचणींवर मात करण्याची चेतना देणारं गाणं आम्ही करत असल्याचाही आनंद होता. गायक हर्षवर्धन वावरे याने सुमधुर आवाजात 'रंग वेगळा...' हे गाणं गायलं आहे. 


मंगेश कांगणेंचं  गीतलेखन

गीतकार मंगेश कांगणे यांनी या सिनेमासाठी गीतलेखन केलं आहे. गायिका वैशाली माडे हिने गायलेलं 'काय काय सांगू तुला ग बाय...', हे गाणं तरुणाईला थिरकायला लावणारं आहे. आजकालच्या हाय फाय लगीनसराईबद्दलचं हळदीचं भन्नाट गाणं चित्रपटाचं मुख्य आकर्षण ठरेल याची खात्री असल्याचंही चिनार-महेश म्हणाले.


बाहुबलीतील धबधब्यावर गाणं चित्रित

‘बाहुबली’ सिनेमात दाखवलेल्या केरळातील अथिरापल्ली धबधब्यावर पहिल्यांदाच मराठी चित्रपटातील चित्रित झालेलं 'मनं का असे...', हे गाणं तितकंच श्रवणीय आणि केरळातील अल्लेपी बॅकवॉटर्सच्या बॅकड्रॉपवर अतिशय नयनरम्य झालं आहे. गायक हृषिकेश रानडे आणि कीर्ती किल्लेदार यांच्या सुमधुर आवाजाने या गाण्यात रंग भरले आहेत.


स्वप्नांचा पाठलाग 

या सिनेमाची कथा शशांकने साकारलेल्या मकरंद आणि त्याच्या कलाक्षेत्राशी निगडित असलेल्या स्वप्नाविषयी आहे. जिद्दीने आपल्या इच्छांचा, स्वप्नांचा पाठलाग करताना कितीही मोठ्या अडचणी आल्या तरीही न कोलमडता निर्धाराने पुढे जाणारा हा तरुण आजच्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करतोय असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.


आशिष भेलकरांचं दिग्दर्शन

बॉलिवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक मधुर भंडारकर, प्रभुदेवा आणि रेमो डिसुझा यांच्या सिनेमांचे सहदिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरु करून मराठीकडे वळलेल्या आशिष भेलकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. '३१ दिवस' मध्ये शशांकसोबत मयुरी देशमुख, रीना अगरवाल प्रमुख भूमिकेत असून, विवेक लागू, सुहिता थत्ते, आशा शेलार, अरुण भडसावळे आणि नितीन जाधव यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत.



हेही वाचा -

...आणि सुबोध बनला ‘काशिनाथ घाणेकर’

अक्षयची प्रस्तुती असलेल्या ‘चुंबक’ चं पहिलं पोस्टर


 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा