मुंबई महापालिका निवडणूक (bmc election) काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी बाकावर बसलेल्या पक्षांतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा खेळही सुरू झाला आहे. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर विरोधकांकडून सातत्याने टीका करण्यात येते, परंतु त्यावर आतापर्यंत कधीही भाष्य न करणारे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच मनसेच्या आरोपांवर मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली.
मनसेचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी महापालिका अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देशपांडे यांनी शिवसेनेवर खंडणीखोरीचे आरोप केले. शिवसेना (shiv sena) ही फेरीवाल्यांकडून रीतसर पावती देवून खंडणी वसूल करते. या पावतीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. फेरीवाल्यांचा होणारा उपद्रव कमी करण्यासाठी आणि कचरा निर्मूलनासाठी घेण्यात येणारा आकार… असं या पावतीवर लिहिण्यात आल्याचं देशपांडे यांनी दाखवून दिलं.
तर त्याआधी केलेल्या एका ट्वीटमध्ये संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी शिवसेनेला 'विरप्पन गँग' असंही म्हटलं होतं. विरप्पनने जेवढं लोकांना लुटलं नसेल त्या पेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल, असं संदीप देशपांडे यांचं ट्विट आहे.
हेही वाचा- रोहीत शर्मावर आक्षेपार्ह शब्दांत टीका, कंगनावर ट्विटरची अॅक्शन
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 4, 2021
(aaditya thackeray first time reaction on mns alligation)
हेही वाचा- “शरजीलला बेड्या पडतील? पण सेक्युलर ए आझम पवारांची परवानगी घेतलीय ना?”