Advertisement

महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षणाची हत्या केली - देवेंद्र फडणवीस

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाबाबत मध्य प्रदेश सरकारला आज सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दिला आहे.

महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षणाची हत्या केली - देवेंद्र फडणवीस
SHARES

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाबाबत मध्य प्रदेश सरकारला आज सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दिला आहे. त्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाची हत्या केली, अशी घणाघाती टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारने सुप्रीम कोर्टात सादर केलेले अहवाल अत्यंत दयनीय होता. त्या अहवालात कोणाचीही सही नव्हती. तारीख नव्हती. त्यामुळेच हा अहवाल फेटाळला गेला आणि त्याचा फटका ओबीसी समाजाला बसला. मात्र, आपल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने व्यवस्थित इम्पिरिकल डेटा सादर केल्याने त्या राज्यात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेदेखील ओबीसी आरक्षणाबाबत ओबीसी आयोग जो अहवाल तयार करत होता, त्याकडे अजिबात लक्ष नव्हते. आपल्या मागून येऊन मध्य प्रदेश सरकारने ओबीसी आरक्षण मिळवले. आपल्याकडे अजूनही इम्पिरिकल डेटा तयार नाही. यावरुन ओबीसी आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारची नियत स्पष्टपणे दिसून आली आहे, असे फडणवीस म्हणाले.

ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने जो हलगर्जीपणा केला, त्यासाठी महाविकास आघाडीतील संबंधित मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणीही देवेंद्र फडणवीसांनी केली.

ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडलो नाही. सर्वोच्च न्यायालयात आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न केले, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

तसेच, मध्य प्रदेश सरकारला कोणत्या आधारावर ओबीसी आरक्षण मंजूर करण्यात आले, याचा अभ्यास करुन राज्य सरकारतर्फे पुन्हा न्यायालयात बाजू मांडली जाईल, अशी माहितीही बाळासाहेब थोरात यांनी दिली.



हेही वाचा

...तर, निवडणुका घेण्यास काय अडचण? सुप्रिम कोर्टाचा सवाल

राज ठाकरेंची तोफ पुन्हा पुण्यात धडाडणार, परवानगीसाठी पोलिसांना पत्र

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा