अन्वय नाईक कुटुंबाला पुढं करून उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे पैशांची अफरातफर करत आहेत. उद्धव ठाकरे तुमची गाठ माझ्याशी आहे, तुम्हाला सगळे हिशोब द्यावेच लागतील, असा थेट इशारा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.
भाजप (bjp) कार्यालयात शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. नाईक कुटुंबाने आमचा जमीन खरेदीविक्रीचा व्यवसाय असल्याचं सांगितलं, पण मुख्यमंत्र्यांचाही तोच व्यवसाय आहे, मात्र यावर कुणी बोलत नाही, रश्मी ठाकरे यांनी ८ वर्षे कर भरलेला नाही, पैशांची अफरातफर होत असेल तर बोलावंच लागेल, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
सोबतच जागा विक्रीच्या बाबतीतही गंभीर आरोप केले. ते म्हणाले, मुलुंड पूर्वेकडील केळकर काॅलेज जवळील जागा वादात आहे. ही जागा काही वर्षांपूर्वी स्वास कन्स्ट्रक्शनला लीजवर देण्यात आली. कोविडच्या काळात लाॅकडाऊन असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही जागा हाॅस्पिटलच्या नावाने ताबडतोब विकत घेण्याच्या सूचना मुंबई महापालिका आयुक्तांना दिल्या. त्यानंतर आॅगस्ट २०२० मध्ये या जागेवर ५ हजार खाटांचं हाॅस्पिटल बांधण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. त्यावेळी ही जागा महाराष्ट्र सरकारच्या नावावर होती.
हेही वाचा- “मराठा आरक्षणप्रश्नी सरकारकडे काही ठोस नियोजन आहे की नाही?”
COVID & Corruption Multiplying in Thackeray Sarkar. Land Owned by Maharashtra Govt, transferred to Swas Builders @ ₹62 Crore to Buy Back @ ₹2106 Crore for 5000 Bed Hospital @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4India pic.twitter.com/Ysi1BD5oQS
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 12, 2021
त्यानंतर ८ आॅक्टोबर रोजी २४ तासांत ही जागा स्वास कन्स्ट्रक्शनच्या नावे करण्याचं कारस्थान ठाकरे सरकारने रचलं. त्यासाठी ६१,६१,७६,२९८ रुपये भरण्याचे आदेश दिले. कंपनीने हे पैसे २४ तासांत भरले. त्यानंतर मुंबई महापालिका आयुक्तांनी २४ तासांत महाराष्ट्र सरकारला (maharashtra government) ही जागा २१०६ कोटी रुपयांना घेण्याचा अहवाल पाठवला.
मुंबई (mumbai) जिल्हाधिकाऱ्यांकडे या फाईलची मागणी केल्यास ही फाईल उपलब्ध नाही, असं उत्तर आलंं. जागा विकत देण्यासाठी महाराष्ट्र सरकार ६१ कोटी रुपये लावते आणि अवघ्या २४ तासांत ती जागा २१०६ कोटी रुपयांत विकत घेण्याचा निर्णय घेते, उद्धवा अजब तुझं सरकार! असे आरोप केले. त्याचसोबत या घाेटाळ्याची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि लोकायुक्त यांच्याकडे केली आहे.
(bjp leader kirit somaiya land corruption allegations on maharashtra cm uddhav thackeray)