लोकसभा निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते, मात्र महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांच्या आघाडीत जागांबाबत एकमत होऊ शकलेले नाही. गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्र आणि दिल्लीत उच्चस्तरीय बैठका होऊनही अंतिम करार होण्यास विलंब होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी उत्तर-पश्चिम आणि दक्षिण मुंबईतून उमेदवारी मागे घेतल्याने आता भाजप पाच आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एका जागेवर निवडणूक लढवणार असल्याचं एकमत झालं आहे. मात्र, ठाण्यासह राज्यातील तीन जागांवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात तणाव आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत युतीमध्ये भाजप लोकसभेच्या 34 जागा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना 10 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेच्या 4 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचा फॉर्म्युला ठरला.
मात्र, एकनाथ शिंदे 10 जागांवर समाधानी नसून ते 13 जागांची मागणी करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण रखडले असून, दोन-तीन दिवसांत महायुतीच्या जागा आणि उमेदवारांची नावे निश्चित होतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते.
हेही वाचा