Advertisement

रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर, आदित्य ठाकरेंचा नवा आरोप

रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय.

रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर, आदित्य ठाकरेंचा नवा आरोप
SHARES

रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पही(  Bulk drug park project) महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. राज्यातील प्रकल्प बाहेर जात असताना मुख्यमंत्री महोदय गणेश मंडळांना भेटी देत होते, असा आरोप बुधवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला.

आदित्य ठाकरे म्हणले, बल्क ड्रगमध्ये सरकार पावणेतीन हजार कोटी गुंतवणूक करणार होती. नव्या घटनाबाह्य बेकायदेशीर सरकारने 40 आमदारही तिकडं नेले आणि दोन मोठे प्रकल्पही तिकडं नेले.  केंद्राबरोबर नीट सांगड घातल्यास सर्व शक्य आहे. पण यांचे कारभारात लक्ष नाही. बल्क ड्रगमुळे 80 हजार रोजगार निघून गेले आहेत.  अजून तरूण शांत आहेत पण त्यांचा अंत नका पाहू नका. बल्क ड्रग पार्कही आपल्याकडून कसा काय गेला? एकही गुंतवणूक केंद्राच्या परवानगीशिवाय येऊ शकत नाही. मग केंद्राला पाठपुरावा करून आम्ही आणले मग यांना का जमत नाही?

बल्क ड्रग पार्कसाठी केंद्राला आम्ही पत्र देऊन मागणी केली होती. पण तोही गुजरातमधील भरूचकडे जात आहे. 

सुभाष देसाई म्हणाले की, आम्ही 38 हजार कोटींचे इन्सेंटिव्ह पॅकेज दिले आहेत. ते आम्ही 40 हजार कोटीपर्यंत नेणार असल्याचे त्यांना सांगितले होते. पण गुजरातने यापेक्षा 12 हजार कोटींचे कमी पॅकेज दिले आहे. आम्ही त्यांना मुंबईत येऊन MOU करायला बोलवले होते. 26 जुलैला वेदांता फॉक्सकॉनचे शिष्टमंडळ सध्याच्या  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटले. यावेळी 1 लाख 69  हजार कोटींची गुंतवणूक झाल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी केंद्राचे सहकार्य मिळाल्याचे बोलले गेले. मग आता कुठे गेले ते सहकार्य?  बल्क ड्रग पार्कही गुजरातला गेला आहे.  हे नेभळट सरकार आहे, जे बोलत नाहीत.



हेही वाचा

स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके : आदित्य ठाकरे

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज ठाकरे संतप्त, म्हणाले...

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा