Advertisement

केंद्रातलं सरकार परदेशी नाही, मदत मागण्यात गैर काय?- उद्धव ठाकरे

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी केंद्राकडे मदत मागितली तर त्यात बिघडलं कुठे? असा सवाल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

केंद्रातलं सरकार परदेशी नाही, मदत मागण्यात गैर काय?- उद्धव ठाकरे
SHARES

केंद्रात बसलेलं सरकार हे देशातलं सरकार आहे. ते परदेशी नाही. अशा परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी केंद्राकडे मदत मागितली तर त्यात बिघडलं कुठे? असा सवाल करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. सोबतच संकटाच्या परिस्थितीत सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे, राजकारणाचा चिखल करायला नको, असा सल्लाही दिला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोमवारी सोलापूर जिल्ह्यात जाऊन पूरग्रस्त भागांची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

कोणतंही संकट आलं की सगळी जबाबदारी केंद्रावर ढकलायची आणि आपण नामानिराळं व्हायचं हे ठाकरे सरकारचं धोरण योग्य नाही, असा आरोप पुण्याच्या दौऱ्यावर असलेले देवेंद्र फडणवीस यांनी केला हाेता. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात अतिवृष्टी झाल्यानंतर शुक्रवारी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला होता. पूरस्थितीबाबत माहिती घेताना त्यांनी आवश्यक ती मदत करू, असं मला आश्वासन दिलं. अशा परिस्थितीत राज्य सरकारने केंद्राकडे मदत मागितली तर त्यात बिघडलं कुठे? केंद्रातलं मोदी सरकार हे देशाचं सरकार आहे, ते परदेशातील सरकार नाही. पक्षपातीपणा न करता सर्व राज्यांना मदत करणं ही केंद्राची जबाबदारी आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं. (cm uddhav thackeray demands aid from modi government for flood affected farmers in maharashtra)

हेही वाचा - राज्य सरकारचा नाकर्तेपणा लपवणं हेच पवारांचं काम- देवेंद्र फडणवीस

राज्यावर ओढवलेल्या या पूर परिस्थितीत राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन केंद्राकडे मदत मागितली पाहिजे. शेतकऱ्यांचं दु:ख कमी केलं पाहिजे. उगाच राजकारणाचा चिखल करायला नको. शेतकऱ्यांना साह्य करणं, हा माझा प्राधान्यक्रम आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

शेतकऱ्यांशी संवाद साधून सरकार तुमचंच आहे आणि सदैव तुमच्यासोबत आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला. प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे धनादेशही देण्यात आले. मागील काही दिवसांपासून प्रशासनाशी संपर्कात राहून पूरपरिस्थितीची माहिती घेऊन उपाययोजना करत होतो. पाऊस विचित्र पडतोय. एका ७२ वर्षांच्या शेतकरी दादांनी सांगितले की, त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी असा पाऊस पाहिलेला नाही. परतीचा पाऊस पूर्णपणे गेलेला नाही. वेधशाळेने पुढील काही दिवस आणखी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे हे संकट टळलेलं नाही. धोक्याचा इशारा कायम आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सर्वांनाच सतर्क राहण्याची विनंती केली. याआधी निसर्ग चक्रीवादळ, पूर्व विदर्भात आलेला पूर, त्यावेळीही मदत केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

हेही वाचा - मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत? शरद पवारांनी सांगितलं कारण…


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा