देशात माॅब लिंचिंगच्या ज्या घटना घडत आहेत, त्या संघविचारातून घडत असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी करत राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघा (RSS)चे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका केली.
नागपुरातील रेशीमबाग इथं आयोजित संघाच्या विजयादशमी उत्सवात बोलताना भागवत म्हणाले की, मॉब लिंचिंग सारखे शब्द वापरून हिंदू समाजाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. माॅब लिंचिंग हा शब्द भारतातला नसून, मॉब लिंचिंगसारखा प्रकार भारतात होतच नाही, असा दावा त्यांनी केला.
तर, विशिष्ट समुदायाप्रती सहानुभूती व्यक्त करण्यात येत असताना एकमेकांमधील संघर्ष वाढवण्यात येत आहे. अल्पसंख्यकांमध्ये भय निर्माण करण्यात येत असून एकमेकांमध्ये भेद निर्माण करून दुही निर्माण करण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामागे काही विशिष्ट हेतून काम करणारे लोक आहेत. एखाद्या समुदायातील १०-५ लोकांनी कुणावर अत्याचार केले म्हणून त्या अत्याचारासाठी संपूर्ण समुदायाला जबाबदार धरणे चुकीचं आहे. कायदा आपलं काम करेल, ज्यांना शिक्षा करायची आहे, त्यांना ती केली जाईल असंही भागवत म्हणाले.
संघ हे सांस्कृतिक, संविधानाचा व तिरंग्याचा आदर करणारे, आरक्षणाच्या बाजूने, जातीभेद विरोधी, धर्मनिरपेक्ष संघटन आहे असे म्हणणे जितके धादांत खोटे आहे तितकेच माॅब लीचींग हे संघविचारातून आलेले नाही आणि देशात आर्थिक मंदी नाही असे म्हणणे खोटे आहे.
— Sachin Sawant (@sachin_inc) October 8, 2019
खोटे बोलणे हे संघकार्यपध्दतीचा भाग आहे. pic.twitter.com/OLbYeXvgxq
त्यावर प्रतिक्रिया देताना सावंत म्हणाले की, माॅब लिंचिंग हे संघविचारातून आलेलं असं म्हणणं म्हणजे धादांत खोटं बोलण्याचा प्रकार आहे. कारण संघपरिवाराला सातत्याने खोटं बोलण्याची जी सवय आहे, त्यातूनच हे आलेलं आहे. खोटं बोलणं हा संघकार्यपद्धीतीचा भाग आहे.
हेही वाचा-
ईडीची शाखा भाजप कार्यालयात सुरू करा, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची भाजपवर टीका
Shiv Smarak Scam: भाजपच्या भ्रष्टाचाराचा ‘असा’ केला भांडाफोड- सचिन सावंत