Advertisement

दूध विकत घेऊन त्याची भुकटी करणार, राज्य सरकारचा निर्णय

कोरोनाच्या (corona virus) संकटामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि दूध व्यवसाय संकटात सापडला आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून दररोज १० लाख लिटर दुधाची (milk) प्रति लिटर २५ रुपये दराने खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

दूध विकत घेऊन त्याची भुकटी करणार, राज्य सरकारचा निर्णय
SHARES

कोरोनाच्या (corona virus) संकटामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि दूध व्यवसाय  संकटात सापडला आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून दररोज १० लाख लिटर दुधाची (milk) प्रति लिटर २५ रुपये दराने खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुढील ४ ते ५ दिवसांत शेतकऱ्यांकडून दूध संकलन सुरू होईल, या दुधाची भुकटी करून ती नंतर आॅनलाइन विकण्यात येईल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा - लाॅकडाऊन आधी राज्याने लागू केलं, मग केंद्राने, तरी चुकीचा संदर्भ का येतोय- आशिष शेलार

कोरोनाचा (covid-19) संसर्ग रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लाॅकडाऊनमुळे (lockdown) जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय ठप्प झाले आहे. याचा दूध उत्पादक शेतकरी आणि दूध व्यवसायालाही फटका बसला आहे. गावागावातून कंपन्यांच्या माध्यमातून होणाऱ्या दूध संकलनाला मर्यादा आल्या आहेत. दूध उत्पादक कंपन्यांमध्येही कर्मचाऱ्यांची वाणवा असल्याने दूध प्रक्रिया आणि दूध उत्पादन संथ झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांजवळील दूध वाया जात आहे. त्यामुळे हे अतिरिक्त दूध विकत घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.  

दूध विक्री घटल्यामुळे गावागावात दूध स्वीकारलं जात नाही. राज्यात उत्पादित १२ लाख लिटर दुधापैकी १० लाख लिटर दूध अतिरिक्त ठरत आहे. खाजगी बाजारात दूधाचा दर १५ ते १७ रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली घसरला आहे.

हेही वाचा - ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींचं ६० टक्के वेतन कापणार

शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब दूध उत्पादकांना याचा फटका बसत आहे. या शेतकऱ्यांना दिलासा, आधार देण्यासाठी तसंच करोनाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी राज्यात अतिरिक्त ठरत असलेले १० लाख लिटर दूध दूध संस्थांच्या माध्यमातून शासन २५ रुपये प्रतिलिटर दराने खेरदी करेल. त्या दुधाची भूकटी करुन ती साठवली जाईल, नंतर त्याची ऑनलाईन विक्री केली जाईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

राज्य दूध महासंघाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार असून यातून शेतकऱ्यांना आधार व दिलासा मिळेल. यासाठी साधारणपणे २०० कोटी रुपयांचा निधी लागेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा