Advertisement

केंद्राने ठाकरे सरकारला दिले २८ हजार कोटी, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

केंद्र सरकारने एवढा निधी देऊन देखील राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार केंद्राकडून काहीच मदत मिळाली नाही, असा भास निर्माण करत आहे. उलट एवढा निधी मिळून देखील राज्य सरकारमध्ये समन्वय नाही.

केंद्राने ठाकरे सरकारला दिले २८ हजार कोटी, देवेंद्र फडणवीस यांचा दावा
SHARES

केंद्र सरकारने महाराष्ट्राला विशेष आर्थिक पॅकेज (stimulus package for maharashtra) द्यावं, जीसीएसटीची थकबाकी ताबडतोब द्यावी, अशी सातत्याने मागणी करणाऱ्या ठाकरे सरकारला आतापर्यंत केंद्र सरकारने २८ हजार १०४ कोटी रुपयांचा निधी दिल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (bjp leader devendra fadnavis) यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मंगळवार २६ मे २०२० रोजी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्राकडे सातत्याने निधीची मागणी करणाऱ्या महाराष्ट्र सरकाराच्या कारभारावर ताशेरे आढले.

भास निर्माण करण्याचा प्रयत्न

केंद्र सरकारने एवढा निधी देऊन देखील राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार केंद्राकडून काहीच मदत मिळाली नाही, असा भास निर्माण करत आहे. उलट एवढा निधी मिळून देखील राज्य सरकारमध्ये समन्वय नाही. या काळात खर्च कशावर झाला, हे पाहिले तर या सरकारची प्राथमिकता काय आहे, हे सहज लक्षात येईल, असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला. एवढंच नाही, तर त्यांनी केंद्राकडून देण्यात आलेल्या निधीची सविस्तर आकडेवारी देखील जाहीर केली आहे. 

हेही वाचा - महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा- नारायण राणे

केंद्राकडून किती निधी महाराष्ट्राला मिळाला?    

महाराष्ट्राला आरोग्यासाठी मिळालेली मदत

  • महाराष्ट्राला हायड्रोक्सिक्लोरोक्विन: ४७ लाख २० हजार
  • प्रयोगशाळांना मान्यता : शासकीय ४१/खाजगी ३१
  • पीपीई किटस : ९.८८ लाख
  • एन ९५ मास्क : १५.५९ लाख
  • आरोग्यासाठी मदत : ४६८ कोटी

प्रधानमंत्री गरिब कल्याण याजनेअंतर्गत अन्नधान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानुसार या ३ महिन्यांत केंद्र सरकारने अन्नधान्य महाराष्ट्राला दिलं. 

  • गहू : १७५० कोटी रूपये
  • तांदूळ : २६२० कोटी रूपये
  • डाळ : १०० कोटी रूपये
  • स्थलांतरित मजुरांसाठी १२२ कोटी रूपये
  • असे एकूण 
  • एकूण : ४५९२ कोटी रूपये

शेतमाल खरेदीसाठी देण्यात आलेला निधी

  • कापूस : ५६४७ कोटी रूपये
  • धान : २३११ कोटी रूपये
  • तूर : ५९३ कोटी रूपये
  • चणा/मका : १२५ कोटी रूपये
  • तसंच पीकविम्यासाठी ४०३ कोटी रूपये असे एकूण ९०७९ कोटी रूपये

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत १७२६ कोटी रूपये, जनधन योजनेच्या माध्यमातून १९५८ कोटी रूपये, विधवा/दिव्यांग/ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ११६ कोटी रूपये असे एकूण ३८०० कोटी रूपये केंद्र सरकारने दिले.

  • उज्वला गॅस योजनेअंतर्गत ७३ लाख १६ हजार सिलिंडरसाठी १६२५ कोटी रूपये
  • ६०० रेल्वेगाड्यांसाठी ३०० कोटी रूपये
  • बीओसीडब्ल्यू आणि ईपीएफओ यासाठी एकूण १००१ कोटी रूपये
  • एसडीआरएफमध्ये १६११ कोटी रूपये आणि आरोग्यासाठी ४४८ कोटी रूपये असे एकूण २०५९ कोटी रूपये दिले.
  • डिव्हॅल्यूलेशन ऑफ टॅक्सेसच्या माध्यमातून ५६४८ कोटी रूपये देण्यात आले.

केंद्र सरकारच्या पॅकेजमध्ये एमएसएमई/गृहनिर्माण/डिस्कॉम/नरेगा/आरआयडीएफ/कॅम्पा एम्पॉयमेंट/स्ट्रीट वेंडर्स/फार्मगेट इन्फ्रा, मायक्रो फूड एन्टरप्राईजेस, पशुसंवर्धन इत्यादींतून किमान ७८,५०० कोटी रूपये महाराष्ट्राला मिळतील.

जे मिळाले ते २८ हजार १०४ कोटी रूपये, केंद्राच्या निर्णयांमुळे महाराष्ट्राला जो निधी उभारता येऊ शकतो, तो १,५६,००० कोटी रूपये आणि केंद्राच्या पॅकेजमधील ७८ हजार कोटी रूपये असे एकूण २,७१,५०० कोटी रूपयांचा लाभ होऊ शकतो. आता धाडसी निर्णयांची गरज असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा