Advertisement

सोचा था चूल्हा जलाने की बात होगी, साहब दिया जलाने का उपदेश दे गये - नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान चूल पेटवण्यासंबंधी काहीतरी बोलतील असं वाटलं होतं, पण ते तर दिवे लावण्याचा उपदेश देऊन गेले, असं म्हटलं आहे.

सोचा था चूल्हा जलाने की बात होगी, साहब दिया जलाने का उपदेश दे गये - नवाब  मलिक
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी देशाविसायांना संबोधित करताना ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील सर्व लाइट्स बंद करुन दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान चूल पेटवण्यासंबंधी काहीतरी बोलतील असं वाटलं होतं, पण ते तर दिवे लावण्याचा उपदेश देऊन गेले, असं म्हटलं आहे.

हा तर उपदेश

नवाब मलिक यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातून देशवासियांच्या हाती घोर निराशा आली आहे. वाटलं होतं ते चूल पेटवण्यासंबंधी काहीतरी बोलतील. पण ते तर दिवा पेटवण्याचा उपदेश देऊन गेले”.

हेही वाचा- देशाला इव्हेंटची नाही, इलाजाची गरज, बाळासाहेब थोरातांची मोदींवर टीका

इव्हेंट नको

याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही पंतप्रधानांवर टीका केली, थाळी-टाळीनंतर आता देशात दिवे लावण्याचा कार्यक्रम सादर होत आहे. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाला इव्हेंटची नव्हे, तर रुग्णालयं, व्हेंटिलेटर, चाचणी लॅबची गरज आहे. हातावर पोट असलेले मजूर व कामगारांना दोन वेळचं जेवण हवं आहे. त्यामुळं हे प्रसिद्धी स्टंट बंद करून पंतप्रधानांनी काहीतरी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे, असं थोरात म्हणाले.

काय म्हणाले मोदी?

शुक्रवारी सकाळी देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी, भारतात जनतेला ईश्वराचं रुप समजलं जातं आणि कोरोनामुळे निर्माण झालेल्या अंधः कारातून बाहेर पडण्यासाठी मी जनतेकडे काही मागत आहे. मला या रविवारी म्हणजेच ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता तुमची ९ मिनिटं हवी आहेत. घरातील सर्व दिवे, लाइट्स ९ मिनिटे बंद करुन बाल्कनीमध्ये, दारामध्ये एक दिवा लावा किंवा मेणबत्ती, बॅटरी किंवा मोबाईलची फ्लॅश लाइट लावून उभे राहा, असं आवाहन मोदींनी केलं. “कोरोनामुळे पसरलेल्या अंधःकारामध्ये आपल्याला सतत सकारात्मकतेकडे आणि प्रकाशाकडे प्रवास करायचा आहे. मात्र, हे करत असताना जनता कर्फ्यूवेळी चूक करू नका. तुम्हाला सोशल डिस्टन्सिग पाळायचं आहे. कुणीही एकत्र यायचं नाही. कुठेही गर्दी करायची नाही. एकटं राहायचं आहे. एकटं राहुनच हे करायचं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हाच रामबाण उपाय आहे, या शब्दांत आवाहन केलं होतं.

हेही वाचा- Coronavirus Updates: धारावीत विलगीकरण अशक्य


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा