मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प शनिवारी सादर होणार आहे. शुक्रवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आर्थिक पाहणी अहवाल सभागृहात मांडला. "आता विकासदर 9.4 टक्के आहे आणि त्यापेक्षाही अधिक वाढेल," असा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. तसेच "जगाचा सरासरी विकास दर 2.2 टक्के आहे. त्यामानाने राज्याचा विकास दर चांगला आहे. सर्वात जास्त रोजगार देणारा कृषी क्षेत्र आहे. त्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले. "नोटाबंदीमुळे भिती होती की महसूल कमी होईल. मात्र मागील वर्षीपेक्षा 11.04 टक्के जास्त महसूल झाला आहे," अशी माहिती त्यांनी दिली.
अहवालात नमूद केलेले मुद्दे