मागील २ महिन्यांपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत असलेले भारतरत्न माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचं दीर्घ आजारानंतर गुरुवारी सायंकाळी ५.०५ वाजता निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. बुधवारी संध्याकाळपासून त्यांची प्रकृती खालावली होती. वाजपेयी यांना डिमेंशिया नावाचा आजार झाला होता.
वाजपेयी यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी शुक्रवारी सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत नवी दिल्लीतील कृष्ण मेनन या निवासस्थानी ठेवण्यात येणार अाहे. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत केंद्रीय कार्यालयात पार्थिवाचं अंतिम दर्शन घेता येईल. दुपारी १ वाजता अंत्ययात्रेस सुरूवात होणार असून राजघाटामागील राष्ट्रीय स्मृतीस्थळी त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार अाहे.
केंद्र सरकारकडून ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात अाला अाहे. या कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार असून सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात अाले अाहेत. विजयस्थळाच्या बाजूला वाजपेयी यांचं दीड एकरमध्ये स्मारक होणार अाहे.
Former Prime Minister & Bharat Ratna #AtalBihariVaajpayee passes away in AIIMS. He was 93. pic.twitter.com/r12aIPF5G0
— ANI (@ANI) August 16, 2018
वाजपेयी यांना ११ जूनपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. जवळपास ६६ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. तर बुधवारी १५ ऑगस्ट रोजी रात्री त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. गुरूवारी सकाळी त्यांची प्रकृती चिंताजन होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सुरेश प्रभू, यांच्यासह इतर दिग्गज नेते एम्समध्ये दाखल झाले. अनेक नेत्यांनी ट्विट करून दु:ख व्यक्त केलं.
मैं नि:शब्द हूं, शून्य में हूं, लेकिन भावनाओं का ज्वार उमड़ रहा है।
— Narendra Modi (@narendramodi) August 16, 2018
हम सभी के श्रद्धेय अटल जी हमारे बीच नहीं रहे। अपने जीवन का प्रत्येक पल उन्होंने राष्ट्र को समर्पित कर दिया था। उनका जाना, एक युग का अंत है।
पूर्व प्रधानमंत्री व भारतीय राजनीति की महान विभूति श्री अटल बिहारी वाजपेयी के
— President of India (@rashtrapatibhvn) August 16, 2018
देहावसान से मुझे बहुत दुख हुआ है। विलक्षण नेतृत्व, दूरदर्शिता तथा अद्भुत भाषण उन्हें
एक विशाल व्यक्तित्व प्रदान करते थे।उनका विराट व स्नेहिल व्यक्तित्व हमारी स्मृतियों में बसा रहेगा—राष्ट्रपति कोविन्द
ठन गई
— Amit Shah (@AmitShah) August 16, 2018
मौत से ठन गई
जूझने का मेरा इरादा न था
मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था
रास्ता रोक वह खड़ी हो गई
यों लगा ज़िन्दगी से बड़ी हो गई
मौत की उमर क्या है?दो पल भी नहीं
ज़िन्दगी सिलसिला,आज कल की नहीं
मैं जी भर जिया, मैं मन से मरूँ
लौटकर आऊँगा,कूच से क्यों डरूँ? pic.twitter.com/g9mqVzza17
It is my personal loss..
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 16, 2018
One of the greatest leaders ever,Atalji,is no more!
It was Shraddheya Atal ji,whose footsteps are followed by many like me.He is an inspiration to millions & encouraged&taught us how we can serve the last man with the weapon of democracy.
Shat Shat Naman! pic.twitter.com/uJDLS9vObp
His passing away is a personal loss, having spent numerous years in our parliamentary life together, and an irreparable loss to our country. I pray eternal peace for his departed soul.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 16, 2018
With the passing away of former Prime Minister of India and Bharat Ratna Shri.Atal Bihari Vajpayee, the country has lost a leader who was a paragon of high moral values in public life. My deepest condolences to his loved ones and his followers.#AtalBihariVajpayee pic.twitter.com/zIuNbvz7v0
— Ashok Chavan (@AshokChavanINC) August 16, 2018
वह महानायक और अजातशत्रु हैं।वह हम सब में आत्मबल के रूप में सिर्फ और सिर्फ़ अटल है। अटल जी अजर-अमर हैं।उन्हें मेरी भावभीनी श्रद्धांजलि है। ॐ
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 16, 2018
अटलजी आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवायला मन तयार नाही. अटलजी आमच्या हृदयात आहेत. सदैव राहतील ! 💐💐#AtalBehariVajpayee pic.twitter.com/aG87wVeVe0
— Uddhav Thackeray (@uddhavthackeray) August 16, 2018
#AtalBihariVajpayee pic.twitter.com/wpJSfl8CWW
— Raj Thackeray (@RajThackeray) August 16, 2018
अटलजींच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे, ही सर्वांसाठीच मोठी हानी आहे.अटलजींना माझी विनम्र श्रद्धांजली. pic.twitter.com/7o694WCk0q
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) August 16, 2018
सन १९२५ मध्ये जन्म झालेल्या वाजपेयी यांनी १९४२ सालच्या भारत छोडो आंदोलनाद्वारे राजकारणात प्रवेश केला होता. ते १९९१, १९९६, १९९८, १९९९ आणि २००४ मध्ये लखनऊ लोकसभा क्षेत्रातून संसदेत निवडून गेले होते.
पंतप्रधान म्हणून ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले बिगरकाँग्रेसी आणि भाजपाचे नेते होते. त्यांनी १९९६, १९९८ आणि १९९९ ते २००४ या दरम्यान पंतप्रधानपद भूषवलं.
हेही वाचा-
'या' १० वक्तव्यांसाठी वाजपेयी आजही ओळखले जातात
अटलजींमुळेच लोकसभा अध्यक्ष झालो - मनोहर जोशी
तरूणपणी 'असे' दिसायचे वाजपेयी!