मुंबई - 21 फेब्रुवारीला 10 महापालिका, 11 जिल्हा परिषद आणि 283 पंचायत समिती निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी राज्य निवडणूक आयोगाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी ही सुट्टी देण्यात आल्याचे आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.