राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक उपहासात्मक ट्वीट करत राज ठाकरे आणि अमृता फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’! अशी टीका उद्धव ठाकरेंवर केलीय. तर अमृता फडणवीस यांनी ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से! असं ट्वीट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी ‘कुणी योगी आहे, कुणी भोगी आहे, तर कुणी मानसिक रोगी आहे’, असं ट्वीट करत राज ठाकरे आणि अमृता फडणवीस यांना जोरदार टोला हाणलाय.
कोणी योगी आहे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 28, 2022
कोणी भोगी आहे
तर कुणी मानसिक रोगी आहे pic.twitter.com/cPcacvoiZJ
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्वीट करत योगी सरकारचे अभिनंदन केले आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय.
‘उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’! महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना’, असं ट्वीट करत राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
हेही वाचा