Advertisement

मुंबईसह राज्यात युतीचाच भगवा

महाराष्ट्रातही महायुतीच्या बाजूनैच जनतेने कौल दिला असून काँग्रेस राष्ट्रवादीचा पुरता बोऱ्या वाजला आहे. यंदाही भाजपाने राज्यात २३ आणि शिवसेनेने १८ अशा एकूण ३१ जागा ताब्यात घेतल्या असून मुंबईतील सहाही जागांवर निविर्वाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.

मुंबईसह राज्यात युतीचाच भगवा
SHARES

१७ व्या लोकसभा निवडणुकीतही मुंबईसह महाराष्ट्रात महायुतीचा भगवा फडकल्याचं दिसून येत आहे. मतमोजणीच्या फेऱ्या जसजशा आटोपत येत आहेत, तसं तसं निकालाचं चित्र अधिक स्पष्ट होत चाललं आहे. देशाप्रमाणे महाराष्ट्रातही महायुतीच्या बाजूनैच जनतेने कौल दिला असून काँग्रेस राष्ट्रवादीचा पुरता बोऱ्या वाजला आहे. 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत युतीला राज्यातील ४८ पैकी ४१ जागा, तर मुंबईतील ६ पैकी ६ जागा मिळाल्या होता. यंदाही भाजपाने राज्यात २३ आणि शिवसेनेने १८ अशा एकूण ४१ जागा ताब्यात घेतल्या असून मुंबईतील सहाही जागांवर निविर्वाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या तुलनेत काँग्रेसला केवळ १ आणि राष्ट्रवादीला ५ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर एक जागा वंचित बहुजन आघाडीला मिळाली आहे. मुंबईत तर महाआघाडीला आपलं खातंही उघडता आलेलं नाही.

दक्षिण मुंबईत शिवसेनेच्या अरविंद सावंत (४,२०,६७७) यांनी काँग्रेसचे मिलिंद देवरा (३,१९,९९७) यांचा १००,६८० मतांनी पराभव केला. दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेचे राहुल शेवाळे (४,२४,९१३) यांनी काँग्रेसचे एकनाथ गायकवाड (२,७२,७७४) यांचा १,५२,१३९ मतांनी पराभव केला. उत्तर मध्य मुंबईत भाजपाच्या पूनम महाजन (४,८१,५७२) यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त (३,३३,८०३) यांचा १,४७,७६९ मतांनी पराभव केला. उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेचे गजानन किर्तीकर (५,२७,९६०) यांनी काँग्रेसचे संजय निरूपम (२८५७७५) यांचा २,४२,१८५ मतांनी पराभव केला. उत्तर मुंबईत भाजपाचे गोपाळ शेट्टी (६,८८,३९५) यांनी काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर (२,३५,२०१) यांचा ४,५३,१९४ मतांनी पराभव केला. तर उत्तर पूर्व मुंबईत भाजपाचे मनोज कोटक (५,१४,५९९) यांनी राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील (२,८८,११३) यांना २,२६,४८६ मतांनी पराभूत केलं.



 हेही वाचा-

पुन्हा मोदी सरकार! २६ मे ला सत्तास्थापनेचा दावा

ही मोदींची लाट नाही तर सुनामी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा