मुंबई सेंट्रल - गुरूवारी प्रभाग क्रमांक 220 च्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष होते. शेवटपर्यंत रंगलेल्या या निकालाचा निर्णय रसिका साळुंखे या चिमुकलीने काढलेल्या चिठ्ठीने दिला. या चिमुरडीने काढलेल्या चिठ्ठीमुळे भाजापाचे अतुल शहा निवडून आले आणि शिवसेनेच्या सुरेंद्र बागलकर यांचा पराभव झाला. या चिमुकलीशी आणि तिच्या आजीशी ‘मुंबई लाइव्ह’ने खास बातचित केली.