राज्यभरात येत्या २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक होणार असून, या निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे. शुक्रवारी अधिसूचना जारी होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. निवडणुकीसाठी सर्व पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत.
२७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यानंतर ७ ऑक्टोबपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. परंतु, सध्या पितृपक्ष सुरू असल्यामुळं राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे पितृपक्षानंतरच दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, २
ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त
सुट्टी असली तरी या दिवशीही
उमेदवारी अर्ज दाखल करून
घेण्याची मागणी राजकीय पक्षांकडून
निवडणूक आयोगाकडं करण्यात
आली आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकीसाठी किती उमेदवारांची नावं दाखल होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -
Vidhan Sabha Election 2019: मुंबईतील मतदारांच्या संख्येत घट
शरद पवार यांना चौकशीसाठी ईडी प्रवेश नाकारणार?