केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारही पुढं आलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केरळला २० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून या आर्थिक मदतीची माहिती दिली. सरकारबरोबरच 'महाराष्ट्र चेंबर्स आॅफ हाऊसिंग इंडस्ट्रीज' अर्थात एमसीएचआय-क्रेडायनंही केरळमधील पूरग्रस्तांना दीड कोटी रुपयांची आर्थिक मदत दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
केरळमधील पूरस्थितीचा हवाई आढावा शनिवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. त्यानंतर पंतप्रधानांनी केरळसाठी ५०० कोटी रूपयांची मदत जाहीर केली. केरळमध्ये आतापर्यंत ८००० कोटींहून अधिक रुपयांचं नुकसान झालं असून ३२४ जणांचा जीव गेला आहे. अजूनही पूरस्थिती नियंत्रणात आली नसून राज्यात रेड अलर्ट जारी आहे.
CM @Dev_Fadnavis announces ₹20 crore as immediate assistance from Maharashtra Government for Kerala flood affected persons.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 18, 2018
State Government is constantly in touch with Kerala Government for their requirements and the necessary support, since yesterday.#KeralaFloods
या परिस्थितीवर मात करण्यासाठी केरळला मदतीची गरज आहे. हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी शनिवारी राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत केरळला २० कोटींची मदत जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. 'केरळा फ्लड रिलीफ फंड'मध्ये हा निधी जमा करण्यात येणार आहे. तर काँग्रेसच्या आमदारांनी आपला एका महिन्याचा पगार या निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
सामान्य मुंबईकरही सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून केरळमधील पूरग्रस्तांना मदत करत आहेत. बांधकाम क्षेत्रातील संस्था एमसीएसआय-क्रेडायनं केरळ फ्लड रिलीफ फंडला दीड कोटी रुपयांची मदत दिली असून सोबत १० टन्नसाठा केरळला पाठवण्यात येणार आहे. यांत हल्दीराम चिवडा, लाडू, बिस्कीट यासह अन्य खाद्यपदार्थांचा समावेश असेल. हा अन्नसाठा रविवारी सैन्याच्या विशेष विमानानं तसंच जहाजानं केरळला पाठवण्यात येणार असल्याची माहिती एमसीएचआय-क्रेडायच्या प्रवक्त्यांनं 'मुंबई लाइव्ह'ला दिली.
MCHI-CREDAI is contributing with food packets of ₹1.5 crore, Rajasthani Welfare Association & JITO International contributing ₹51 lakh each.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 18, 2018
Around 11 ton of dry food is being arranged so far out of of which 6 ton would be sent by evening. #KeralaFloodRelief
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानंही मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमध्ये मदतकेंद्र उभारली आहेत. या मदतकेंद्रात मिनिरल वाॅटर, तांदूळ, तूरडाळ, बिस्किट, सॅनिटरी नॅपकिन्स आणि औषध जमा केली जात आहेत. वाशीतील केरळा हाऊस, चेंबूरमधील आदर्श विद्यालय, वसईतील बीकेएस स्कूल यासह अन्य ठिकाणी ही मदतकेंद्र असून नागरिकांनी मदतीसाठी पुढं यावं, असं आवाहन सीपीएमकडून करण्यात आलं आहे.
हेही वाचा-
केरळच्या पूरग्रस्तांना मुंबईकरांचा मदतीचा हात