Advertisement

मुंबई महानगरात इतर उद्योगही सुरू होणार, उद्योगमंत्र्यांचे संकेत

मुंबई व परिसरात ज्या भागांत कोरोनाचा प्रभाव नाही, त्याठिकाणी वाहतूक व्यवस्थेसह उद्योग सुरू करण्यासाठी शासन नक्कीच विचार करील, असं सुभाष देसाई यांनी सांगितलं.

मुंबई महानगरात इतर उद्योगही सुरू होणार, उद्योगमंत्र्यांचे संकेत
SHARES

कोरोनाचं संकट कायम असलं तरी उद्योगचक्र बंद ठेवणं अर्थकारणासाठी परवडणारं नाही. त्यामुळे अनलॉक तीनमध्ये मुंबई महानगर व इतर महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योग सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेण्यास तयार आहे. परंतु यासाठी उद्योजक संघटनांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श कार्य प्रणालीचं पालन करण्याची हमी देणारे प्रस्ताव सादर करणं आवश्यक असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई सांगितलं. (maharashtra government ready to give permission to open industry in mmr region says subhash desai)

राज्यातील विविध उद्योजक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत उद्योगमंत्र्यांनी वेबिनारद्वारे चर्चा केली. यावेळी कंटेन्मेंट झोन परिसरातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या उद्योगांसोबत इतर उद्योगांनाही उत्पादनासाठी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. विशेषतः मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली व इतर कंटेनमेंट झोन परिसरातील उद्योग मागील ४ महिन्यांपासून ठप्प आहेत. त्याचा अर्थकारणावर मोठा परिणाम झाल्याचं उद्योजकांनी सांगितलं.

हेही वाचा - गुड न्यूज! मुंबईतील सर्व दुकाने आता एकाचवेळी सुरू राहणार

यावेळी मुंबई, ठाणे, कल्याण, पनवेल, तळोजा, औरंगाबाद, नागपूर आदी भागातील उद्योजकांनी सूचना केल्या. दरम्यान, उद्योग सुरू करण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. मुख्यमंत्री उद्योगचक्र  पूर्ववत करण्याबाबत सकारात्मक आहेत. परंतु त्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. कोरोनाचा प्रसार रोखणे, सॅनिटायझेन, वाहतूक व्यवस्था आदी बाबीं पाळणं आवश्यक आहे. शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याची हमी देणारा प्रस्ताव सादर केल्यास शासन सकारात्मक भूमिका घेईल, असं सुभाष देसाई यांनी सांगितलं.

मुंबई व परिसरात ज्या भागांत कोरोनाचा प्रभाव नाही, त्याठिकाणी वाहतूक व्यवस्थेसह उद्योग सुरू करण्यासाठी शासन नक्कीच विचार करील, असंही देसाई यांनी सांगितलं.

नागपूर, औरंगाबाद व इतर ठिकाणी वाहतुकीच्या समस्या असल्याचे काही उद्योजकांनी सांगितले. त्या सोडविण्याची ग्वाही एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन यांनी दिली. यावेळी उद्योग सचिव  वेणुगोपाल रेड्डी उपस्थित होते. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा