दादर - येथील भाजपा कार्यालयात शुक्रावारी महायुतीची घोषणा करण्यात आली. आरपीआय, शिवसंग्राम, रासप, यांनी भाजापाला पालिका निवडणुकीसाठी भाजपाला साथ दिली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपा 192 जागा लढणार असून, 35 जागा मित्रपक्षासाठी सोडण्यात आल्या आहेत. शिवसंग्राम- 4, रासप -6 तर आरपीआयला 25 जागा देण्यात आल्या आहेत. दरम्यान शिवसंग्रामचे प्रतिनिधी विक्रांत आंबरे यांनी समाधानी आहोत पण संतुष्ट नाही असे पत्रकार परिषदेत सांगितले.