Advertisement

राज ठाकरेंचा एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा, पण ठेवली 'ही' अट

एसटी कामगारांच्या शिष्टमंडळानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली.

राज ठाकरेंचा एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा, पण ठेवली 'ही' अट
SHARES

एसटी कामगारांच्या शिष्टमंडळानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. यावेळी  एसटी कामगारांच्या शिष्टमंडळानं त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडली.

यावेळी एसटी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार, पण एक अट असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. ते म्हणाले की, आत्महत्या करू नका. आत्महत्या करून डाव अर्धवट सोडू नका. ही लढाई आपल्याला लढायची आहे. त्यासाठी मनगटात रक्त आणि ताकद असायला हवी, आत्महत्या करणाऱ्यांचं मी नेतृत्व करणार नाही ही माझी अट आहे. त्यामुळे आत्महत्या थांबवा, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं.

पुढे ते म्हणाले की, मी याबाबत राज्य सरकारशी चर्चा करून तुमच्याशी पुन्हा बोलतो. राज ठाकरे आणि कामगारांनामध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मीडियाशी संवाद साधून बैठकीची माहिती दिली.

एसटी कामगारांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर राज्य सरकारशी चर्चा करण्याचं राज ठाकरे यांनी ठरवलं आहे. ते ताबडतोब सरकारशी बोलणार आहे. स्वत: राज ठाकरे जातीनिशी लक्ष घालून हा प्रश्न सोडवणार आहेत. एकदा सरकारशी बोलणं झालं की मग कामगारांशी बोलेन असं आश्वासन राज यांनी दिलं आहे, असं नांदगावकर यांनी सांगितलं.

२८ संघटनांनी हा संप जाहीर केला आहे. आता १ लाख कर्मचारी संघटना बाजूला ठेवून एकत्रं आले आहेत. संघटनाविरहित लढाई लढत आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. एसटी महामंडळाचं विलनीकरण करावं ही त्यांची मागणी आहे.

राज्य सरकारला उच्च न्यायालयानं १२ आठवड्याची मुदत दिली आहे. समिती गठीत केली आहे. ही माहिती त्यांनी राज ठाकरेंना दिली. सरकारची भावना प्रामाणिक असेल तर राज्य सरकरच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला सातवा वेतन आयोग लागू करावा. त्यानंतर विलनीकराची प्रक्रिया सुरू होईल, असं या कामगारांचं म्हणणं असल्याचं नांदगावर म्हणाले.


हेही वाचा

देवेंद्र फडणवीसांना अब्रू नुकसानीची नोटीस

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा