Advertisement

न्यायालयाने दिलेले निर्देश पाळा, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला


न्यायालयाने दिलेले निर्देश पाळा, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
SHARES

फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून न्यायालयाने दिलेले निर्देश पाळा, तसे झाल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावे लागणार नाही, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
फेरीवाल्यांच्या आंदोलनावरून राज ठाकरे यांनी गुरुवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर बाळा नांदगावकरांनी ही माहिती दिली. यापुढे फेरीवाल्यांवर रेल्वे अथवा बीएमसीने कारवाई न केल्यास फेरीवाल्यांवर कोर्टाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही मनसेच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.


ते आरोप बिनबुडाचे -

‘हायकोर्टाने आधीच 150 मीटरच्या आत फेरीवाल्यांना मनाई केलेली आहे. आम्हाला लाठ्या-काठ्या घेऊन मुले पाठवण्याची हौस नाही. पण अनधिकृत फेरीवाल्यांना किती काळ आम्ही सहन करायचे, म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावे लागते’ असेही नांदगावकर यांनी यावेळी सांगितले. एल्फिन्स्टन स्टेशनवर चेंगराचेंगरी होऊन 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर मनसेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मोर्चा काढला. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली.



हेही वाचा - 

फेरीवाला वादात राणे पुत्रांची उडी, निरुपम यांच्यावर जोरदार टीका


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा