Advertisement

'राज ठाकरेंच्या सभा म्हणजे निव्वळ टाईमपास'- विनोद तावडे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचार सभांना जाणारी लोक केवळ टाईमपास, मनोरंजन आणि करमणुकीसाठी जातात असे त्या सभेला जाणारी लोकच सांगतात.

'राज ठाकरेंच्या सभा म्हणजे निव्वळ टाईमपास'- विनोद तावडे
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचारसभांना जाणारी लोकं केवळ टाईमपास, मनोरंजन आणि करमणुकीसाठी जातात असं त्या सभेला जाणारी लोकंच सांगतात. पण त्यांच्या पक्षाप्रमाणे आमचा पक्ष टुरिंग टॉकिजचा पक्ष नाही, आमचा राजकीय पक्ष विचाराने चालतो, असा मार्मिक टोला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लगावला. तावडे शनिवारी प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.


पानसेंचा जावईशोध

राज ठाकरे यांच्या मताचा अधिकार सरकार काढतेय, असा जावईशोध मनसे नेते अभिजीत पानसे यांनी लावला आहे. पानसे यांना बहुधा त्यांच्या ठाकरे या त्यांच्या चित्रपटाची स्क्रिप्ट आठवली असेल, पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा मताचा अधिकार काढून घेतला त्यांनाच मते द्या असे आज राज ठाकरे सांगत आहेत, अशी टीकाही तावडे यांनी केली.


खोटेनाटे आरोप

मनसेकडून विनाकारण खोटेनाटे आरोप पसरवले जात आहेत. राज ठाकरे यांच्या सभांना गेलेला माणूस टाईमपाससाठी गेलो होतो असे सांगतो. राज ठाकरे यांना नोटाबंदी का झोंबली हे कळायला मार्ग नाही. नोटाबंदीदरम्यान जे पैसे बँकेत आले ते कोणाकोणाच्या नावाने आले, त्याची माहिती त्यांनी घेतली पाहिजे, म्हणजेचे जे पैसे बाहेर अनअकाऊंटेड फिरत होते ते अकाऊंटेड झाले याचा अर्थ काळा पैसा आला नाही का ? यासाठी अर्थकारण समजून घ्यावं लागतं आणि ते समजलं नाही की अशी काहीतरी गडबड होते, असा टोलाही त्यांनी राज यांना लगावला.


ही राजकीय दिवाळखोरी

ज्या पक्षाने वर्षोनुवर्षे सत्तेत राहूनही विकासाची कामे केली नाहीत त्यांना मते द्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुमारे ४० टक्के ड्रीम प्रोजेक्टची कामे पूर्ण केली व अजूनही काही प्रोजेक्टची कामे सुरु आहेत त्या मोदी सरकारला मात्र मत देऊ नका, असे म्हणणे म्हणजे राजकीय दिवाळखोरी आहे, असंही तावडे यांनी सांगितलं.


पवारांकडून सोयीचं राजकारण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा गणवेशात नाही तर विचारात आहे आणि मोहीते–पाटील यांनी त्या विचाराचा स्वीकार केला असेल तर शरद पवार यांना वाईट वाटण्याचे कारण असल्याचे तावडे म्हणाले. ‘मोहिते पाटील तुम्ही आता संघाची अर्धी चड्डी आणि शर्ट घालू नका’ या टीकेला प्रत्युत्तर देताना तावडे म्हणाले की, शरद पवार यांनी जेव्हा पुलोदचे मुख्यमंत्री होताना सुद्धा ते विचार स्वीकारले होते, तेव्हा संघाविषयी मांडलेली मते आठवून बघावीत.

त्यामुळे तुमच्या सोयीसाठी तुम्ही सोयीचे राजकारण करता पण मोहिते-पाटील यांनी तसे केले नाही. संघ हा गणवेशात नाही तर विचारात आहे. त्यांनी संघाच्या विचारांचा स्वीकार केला आहे. या विचारासोबत जाऊन जर राज्याचा आणि देशाचा विकास होणार असेल तर तसं करणं आवश्यक आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.




हेही वाचा -

'चुनाव का महिना, राफेल करे शोर...' आव्हाडांची गाण्यातून नरेंद्र मोदींवर टीका

देवराच दक्षिण मुंबईचे योग्य प्रतिनिधी, मुकेश अंबानींनी दिला पाठिंबा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा