Advertisement

गडकरींच्या कबुलीमुळे बेरोजगारीवर शिक्कामोर्तब - अशोक चव्हाण


गडकरींच्या कबुलीमुळे बेरोजगारीवर शिक्कामोर्तब - अशोक चव्हाण
SHARES

 देशात नोकऱ्याच उपलब्ध नाहीत अशी जाहीर कबुली देऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील वाढत्या बेरोजगारीवर शिक्कामोर्तब केल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.


सरकारचा खोटेपणा चव्हाट्यावर 

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असल्याचा अारोप करून अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रेस पक्षाने वारंवार हा मुद्दा उपस्थित केला. मात्र, सरकारने धादांत खोटी आकडेवारी देऊन रोजगारनिर्मितीबाबत देशाची दिशाभूल केली. आता नितीन गडकरी यांनीच नोकऱ्या कुठे आहेत? असा सवाल करून सरकारचा खोटेपणा चव्हाट्यावर आणला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच गडकरी यांच्या प्रश्नाबाबत स्पष्टीकरण द्यावे.


सरकारची चुकीची धोरणे 

एकीकडे नितीन गडकरी नोकऱ्या नाहीत असे सांगतात तर दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुमारे २४ लाख पदे रिक्त असल्याचे सांगितले जाते. सरकारी नोकरभरती होत नाही. दुसरीकडे मोदी सरकारची चुकीची धोरणे आणि नोटाबंदीच्या अविचारी निर्णयामुळे खासगी क्षेत्रातील रोजगार निर्मिती ठप्प झाली आहे. देशातील बेरोजगारांनी याविरूद्ध आक्रोश केला असता पंतप्रधान त्यांना पकोडे विकण्याचा सल्ला देत आहेत, असंही चव्हाण म्हणाले.



हेही वाचा -

'पीव्हीआर'ला मनसेच्या 'रिअॅलिटी चेक'चा दणका!

सरकारी कर्मचारी मंगळवारपासून ३ दिवस संपावर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा