Advertisement

आदित्य ठाकरेंविरोधात FIR दाखल करा, राष्ट्रीय बाल आयोगाचे पोलिसांना निर्देश

राष्ट्रीय बाल आयोगाच्या या पत्रामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

आदित्य ठाकरेंविरोधात FIR दाखल करा, राष्ट्रीय बाल आयोगाचे पोलिसांना निर्देश
SHARES

शिवसेनेचे आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackery) यांच्याविरोधात राष्ट्रीय बालहक्क आयोगाने मुंबई पोलिसांना FIR दाखल करण्याचे निर्देश दिलेत. आदित्य यांच्यावर आरे बचाव आंदोलनात मुलांचा वापर केल्याचा आरोप आहे.

रविवारी आरे बचाव आंदोलनात (aarey forest protest) लहान मुलांचा उपयोग केल्याचा आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची सूचना राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाने दिली आहे.

3 दिवसांत एफआयआरआरसह अहवाल देण्याचा राष्ट्रीय बाल आयोगाने मुंबई पोलिसांना आदेश दिले आहे. राष्ट्रीय बाल आयोगाच्या या पत्रामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने आरे जंगलातच मेट्रो कारशेड बांधण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाविरोधात पर्यावरणवाद्यांकडून आरेत आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी झाले होते.

यासोबतच आंदोलनात काही बालकांनीही सहभाग घेतला होता. याविरोधात सह्याद्री हक्क मंचाचे विधी प्रमुख ध्रुतीमन जोशी यांनी बालहक्क आयोगाकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन आयोगाने आदित्य विरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिलेत.

मुंबईतील मेट्रोच्या वेगवेगळ्या मार्गाचं मेट्रो कारशेड फडणवीस सरकारच्या काळात आरेत उभारण्याचा निर्णय झाला होता. या निर्णयाविरोधात पर्यावरणवादी आणि मुंबईकरांकडून विरोध होत होता. त्यावेळी शिवसेनेने देखील आरेमधील कारशेडला विरोध करत हा प्रकल्प इतरत्र उभारण्याचा शब्द मुंबईकरांना दिला.

त्यानुसार ठाकरे सरकार येताच हा प्रकल्प आरे मधून हलवून कांजूरमार्ग येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता नव्याने आलेल्या शिंदे सरकारने पुन्हा एकदा कांजूरमार्गमधील प्रकल्पाला स्थगिती देत आरेतच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात पुन्हा एकदा पर्यावरणवादी आणि मुंबईकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

"अडीच वर्षांपूर्वी जेव्हा आपलं सरकार आलं तेव्हा आपण आरे जंगल म्हणून घोषित केलं होतं आणि कांजूरला कारशेड करणार असा निर्णय घेतला होता. पण हे सरकार आमच्या पाठीत खंजीर खुपसून तयार झाले आणि आता आरेत पुन्हा कारशेड उभारून मुंबईकरांच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत," अशी टीका यावेळी आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केली होती.



हेही वाचा

आरेतील मेट्रो कारशरेडला विरोध करण्यासाठी आदित्य ठाकरे उतरले रस्त्यावर

मनसेच्या आमदाराला मंत्रिमंडळात स्थान देणे योग्य नाही : रामदास आठवले

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा