Advertisement

क्रांती रेडकरचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र, बाळासाहेबांना हे...

समीर वानखेडे प्रकरणावरून क्रांती रेडकरनं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. जाणून घ्या तिनं काय मागणी केली आहे ते...

क्रांती रेडकरचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र, बाळासाहेबांना हे...
SHARES

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र लिहित क्रांतीनं न्याय देण्याची मागणी केली आहे.

रोज सकाळी आमच्या अब्रूची लख्तर चार चौघात उधळली जातात, बाळासाहेबांना हे नक्कीच पटले नसते, असे म्हणत क्रांतीनं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. यानंतर क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना फोन करून मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी वेळ मागितला आहे.

'माननीय उद्धव ठाकरे साहेब,

लहानपणा पासून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेव ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. कुणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करू नये हे त्या दोघांनी शिकवले. तोच धडा गिरवत आज मी एकटीनं माझ्या खाजगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे आणि लढतेय. सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघत आहेत.'

'मी एक कलाकार आहे. राजकारण मला कळत नाही आणि मला त्यात पडायचं सुद्धा नाही. आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रूची लख्तरं चार चौघात उधळली जातात. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्यागरिमेचा खेळ करून ठेवला आहे. विनोद करून ठेवला आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटले नसते, असं ती म्हणाली.

तिनं पुढे म्हटलं की, एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खाजगी हल्ले हे राजारणाचे किती नीच स्वरूप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्या पर्यंत पोहोचलेले आहे. आज ते नाही पण तुम्ही आहात. त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो. तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही ह्याचि मला खात्री आहे. म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेनं पाहतेय. तुम्हीं योग्य तो न्याय करा अशी विनंती.'



हेही वाचा

'समीर वानखेडेंना त्रास देऊ नका', नवाब मलिकांना आला धमकीचा फोन!

आर्यन खानला जामीन मिळावा यासाठी भाजप आमदार राम कदमांची प्रार्थना

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा