Advertisement

'अत्याचार थांबवा'


'अत्याचार थांबवा'
SHARES

बोरिवली - राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांच्यावतीने बोरिवलीच्या नॅशनल पार्क येथे शनिवारी मोर्चा काढण्यात आला. यात सुमारे 2 हजार स्त्री-पुरुष सहभागी झाले होते. मालाड पश्चिम आप्पापाडा येथील रहिवाशांना विद्या चव्हाण यांच्या माध्यमातून पाणी आणि विजेची सोय करण्यात आली होती. या पाण्याच्या पाईपलाईनचे काम करताना शनिवारी सकाळी स्थानिक कार्यकर्ता वैभव पराडकर यांना वन विभागाने अटक केली. त्याचा निषेध म्हणून संजय गांधी उद्यानाच्या संचालक कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. या वेळी वन विभागाने त्यांच्या हद्दीतल्या डोपडपट्टीतील राहिवाशांवर अत्याचार थांबण्याची मागणी करण्यात आली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा