कांदिवली - चारकोप परिसरात काँग्रेस पार्टीतर्फे कोकण मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला काँग्रेस आमदार नितेश राणे आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी भेट दिली. या वेळी दोघांनी भाजपा आणि शिवसेनेवर टीका केली. तर काँग्रेसला मतदान करावे असे आवाहन दोघांनी केली. मुंबई पालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही ना काही कार्यक्रम आयोजित करत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने मेळाव्याचे आयोजन केले होते.