Advertisement

भाजपाशिवाय कोणाचेही सरकार येणार नाही - देवेंद्र फडणवीस


भाजपाशिवाय कोणाचेही सरकार येणार नाही - देवेंद्र फडणवीस
SHARES

महाराष्ट्रात अद्याप कोणत्याही पक्षानं सरकार स्थापन केलं नसून, राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. मात्र, असं असलं तरी मुंबईत भाजपाच्या बैठका सुरू आहेत. गुरूवारी झालेल्या बैठकीत भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांना संबोधित केलं. तसंच, 'राज्यात भाजपाशिवाय कोणाचंही सरकार येऊ शकत नाही’, असं म्हटलं. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.


शिवसेनेवर टीका

देवेंद्र फडणवीस यांना या बैठकीत शिवसेनेवरही टीका केली. दरम्यान, भाजपाच्या सहभागाचा फायदा मित्रपक्षांना झाला असूं त्यामुळं त्यांना अधिक जागांवर विजय मिळवता आला. भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेच्याही अनेक मतदारसंघात प्रचार केला. परंतु शिवसेनेचा कोणताही नेता भाजपा उमेदवाराच्या मतदारसंघात प्रचारासाठी आला नाही, असं त्यांनी म्हटलं. भाजपा वगळता राज्यात कोणाचंही सरकार स्थापन होऊ शकत नाही, अशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे. योग्यवेळी पक्षाकडून निर्णय घेण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा - राज्यात ५ वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री?


कामाला लागा

देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना मुंबईत न थांबता जनतेची कामं करण्यासाठी जाण्याच्या सुचना केल्या आहेत. शेतकऱ्यांना मोठी मदत मिळेल हे नक्की असल्याची त्यांनी म्हटलं. मात्र, सध्या त्यांना जाऊन मदत करावी, त्यांच्या दु:खात सहभागी व्हावं. सत्तेसाठी काम करणं हे आपलं लक्ष्य नसून जनेतेसाठी काम करणं हे आपलं लक्ष्य असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.

हेही वाचा - महाशिवआघाडीचा मसुदा तयार? सत्ता स्थापनेच्या दिशेने एक पाऊल पुढे...


तीन अंकी नाटक

'राज्यात सत्तास्थापनेचं जे तीन अंकी नाटक सुरू आहे, त्यावर भाजपा लक्ष ठेवून आहे. राज्यभरात भाजपाच्या संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. भाजपाचे सर्व आमदार येणाऱ्या महिनाभराच्या काळात राज्यभरातील ९० हजार बूथवर भाजपा मजबूत करण्यासाठी संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम राबवणार आहेत. याचबरोबर ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील आमदार, विधानपरिषद सदस्यदेखील २ ते ३ दिवस अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, मदत, पीक विमा कर्ज परतफेड या सर्व विषयांसाठी मदत कार्याची पाहणी आणि मदत करायला दौरा करणार आहे', अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली.



हेही वाचा -

राज्यात साथीच्या आजारांचं प्रमाण अधिकच

मध्य रेल्वेकडून 'इतक्या' मुलांची घरवापसी



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा