Advertisement

लॉकडाऊन उठवला तर इतर देशांसारखी अवस्था होईल : मुख्यमंत्री

लागू करण्यात आलेला चौथा लॉकडाऊन कसा असेल यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं.

लॉकडाऊन उठवला तर इतर देशांसारखी अवस्था होईल : मुख्यमंत्री
SHARES

लॉकडाऊन 4.0 लागू झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. लागू करण्यात आलेला चौथा लॉकडाऊन कसा असेल यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं.


रेड झोनमध्ये निर्बंधच

ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आणखी काही निर्बंध शिथिल होणार, असं मुख्यमंत्री म्हणाले. पण महापालिका क्षेत्रातल्या रेड झोन क्षेत्रांमध्ये निर्बंधांमध्ये फारशी शिथिलता आणता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

३१ मे पर्यंत महाराष्ट्रासह देश लॉकडाऊनमध्ये आहे. पण यामागे कुणाला डांबून ठेवायचा उद्देश नाही, असं ठाकरे म्हणाले. "कुणालाही घरात डांबून ठेवणं यासारखी शिक्षा नाही. लॉकडाऊनचं चक्रव्यूह भेदणार आहोत की नाही, याचं उत्तर जगात कुणाकडे नाही. आपल्याकडेही नाही", असं त्यांनी सांगितलं.


लॉकडाऊन का वाढवला?

"महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढत आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद इथं जास्त रुग्ण आहेत. जर लॉकडाऊन, संचारबंदी केली नसती तर रुग्णसंख्या किती झाली असती, किती लोक गमावले असते याची आकडेवारी ऐकून थरकाप उडतो. कोरोना संपलेला नसला, तरी त्याचा संसर्ग कमी झाला आहे. गतिरोधक म्हणून लॉकडाऊनचा उपयोग झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊन हटवणार नाही, माझ्यावर टीका झाली तर होऊ दे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी टीका सहन करेन."


परप्रांतीयांना आवाहन

"आतापर्यंत ५ लाख मजूरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पोहोचवलं आहे.  ट्रेनची सुविधा सुरू झाली आहे. हळूहळू आणखी ट्रेन वाढतील. तुम्ही उतावीळ होऊ नका. तुम्हाला सुरक्षितपणे तुमच्या राज्यात पाठवू. कृपया रस्त्यावरून चालत जाऊ नका. स्वतःचा जीव धोक्यात टाकू नका. सरकार तुमची काळजी घेईल. तुम्हाला घरी सोडायची जबाबदारी आमची आहे," असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

Coronavirus चा प्रादुर्भाव कमी झालेला नसल्यामुळे आजपासून देशभरात चौथ्यांदा टाळेबंदी कायम ठेवली आहे. या Lockdown 4.0 ला सुरुवात झाली आहे. तरी या लॉकडाऊनमध्ये आधीपेक्षा अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा