संभाजीराजे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यसभा निवडणुक लढवण्याच्या निर्णयातून त्यांनी माघार घेतली आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी पत्रकार परिषद घेत दिली.
ते म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही, पण ही माझी माघार नसून, स्वाभिमान आहे. शिवसेनेनं माझ्यासमोर पक्ष प्रवेशाची अट कायम ठेवली होती, पण मी स्पष्ट शब्दात नकार दिल्याचे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले. छत्रपतीला आम्हाला बाजूला ठेवायचे नाही. बरोबर ठेवायचे आहे. त्यामुळे तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यासमोर ठेवला होता.
Maharashtra | Sambhaji Raje says he is withdrawing his nomination for the Rajya Sabha elections
— ANI (@ANI) May 27, 2022
"I have withdrawn my nomination to avoid horse-trading. I'm a descendant of Shivaji Maharaj & I also have my own pride. I'll strengthen Swarajya organisation in Maharashtra," he adds. pic.twitter.com/oUbBpc4HJ1
मला दोन खासदार भेटायला आले आणि त्यांनी मला सांगितलं की शिवसेनेत तुम्ही प्रवेश करा. उद्या आपली उमेदवारी जाहीर करु. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचाही मला फोन आला. त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं असेही ते म्हणाले. त्यांनी आम्हाला सांगितले की, छत्रपती आमच्यासोबत हवे आहेत. शिवसेनेत प्रवेश करावा असे त्यांनी सांगितले, पण मी त्यांना सांगितल की मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे, असं संभाजीराजे म्हणाले.
संभाजीराजे पुढे म्हणाले की, त्यांना मी प्रस्ताव सांगितलं की, मला महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार घोषित करा. पण मुख्यमंत्री म्हणाले की, हे शक्य होणार नाही. परंतू ते म्हणाले की शिवसेना पुरस्कृत उमेदवार व्हा. त्यानंतर त्यांच्या एका मंत्र्यांचा फोन आला की आपण एक मध्यमार्ग काढू. त्यानंतर एक ड्राफ्ट तयार करण्यात आला. तो ड्राफ्ट माझ्याकडे आहे. त्यानंतर एक शिष्टमंडळ आलं. मुख्यमंत्र्यांचे एक स्नेही माझ्याकडे आले त्यांनी सांगितले की, शिवसेनेत तुम्ही प्रवेश करा. त्यानंतर त्यांनी एक ड्राफ्ट मला सांगितला, तो ड्राफ्ट फायनल केला. त्यानंतर मी कागदपत्रे तयार करण्यासाठी कोल्हापूरला गेल्याचे संभाजीराजेंनी सांगितले.
कोल्हापूरला जाताना मी बातम्या पहिल्या की कोल्हापूरच्या एका व्यक्तीला उमेदवारी दिली. संभाजीराजे शिवबंधन बांधणार अशा बातम्या दिल्या गेल्या. यावेळी मी मुख्यमंत्र्यांना फोन केला, परंतु त्यांनी फोन उचलला नाही. त्यांनी शब्द पाळला नाही. असेही संभाजीराजे म्हणाले.
येणाऱ्या काळात विस्तापित मावळ्यांना एकत्र करण्याचे काम मी करणार आहे. मी स्वराज्यच्या माध्यमातून उभा रहाणार आहे. ज्या आमदारांनी सह्या केल्या त्यांच्या पाठीशी मी आयुष्यभर राहणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले.
हेही वाचा