Advertisement

नारायण राणे येऊन गेल्यानंतर शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण

नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर शिवसैनिकांनी यांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं आहे.

नारायण राणे येऊन गेल्यानंतर शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण
SHARES

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आपल्या जन-आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. या दरम्यान त्यांनी शिवाजी पार्क इथं जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन नतमस्तक होत वंदन केलं. मात्र यानंतर आता संध्याकाळी काही शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करण्यात आलं.

नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर शिवसैनिकांनी यांच्या स्मृतीस्थळावर गोमुत्र शिंपडून, दुधाचा अभिषेक घातला. दुपारी नारायण राणे यांनी स्मृतीस्थळावर आले होते. त्यामुळे हा परिसर अशुद्ध झाला असल्याचं शिवसैनिक म्हणाले. त्यामुळे आता राज्यात नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे केअर टेकर आप्पा पाटील यांनी शुद्धीकरण केलं.

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केल्यानंतर आप्पा पाटील म्हणाले की, 'आज ही वास्तू अपवित्र झाली. तिथे दुग्धाभिषेक करून शुद्धीकरण केलं आहे. बाळासाहेबांची फ्रेम पाण्यानं धुवून तिच्यावर दुग्धाभिषेक घातला. यानंतर बाळासाहेबांना आवडणारी चाफ्याची फुलं तिथं वाहण्यात आली.

तसंच नारायण राणेंविषयी बोलताना ते म्हणाले की, त्यांना आज शिवसेना दिसली. एवढ्या वर्षात शिवसेना सोडून गेल्यानंतर त्यांना बाळासाहेब दिसले नव्हते. तसंच देशाच्या टॉप पाचमध्ये असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ते काहीही बोलत होते. आम्ही ठाकरे कुटुंबाबद्दल निष्ठा राखणारे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्ही हे सहन करू शकणार नाही. याच कारणामुळे आम्ही हे शुद्धीकरण केले आहे'.



हेही वाचा

३२ वर्षांचा पापाचा घडा भरणार, मुंबई महापालिका भाजपच जिंकणार- नारायण राणे

भाजपची जन आशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रणच- संजय राऊत

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा