मुंबई - विधानसभेमध्ये चर्चा न करताच अर्थसंकल्प मंजूर केल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. भाजपा-शिवसेनेच्या आमदारांशिवाय विरोधी पक्षाचे इतर आमदार विधानसभेमध्ये नसताना अर्थसंकल्प मंजूर केल्याने शिवसेना आक्रमक झाली.
चर्चा न करताच अर्थसंकल्प मंजूर करणं म्हणजे एकप्रकारे ही मुस्कटदाबीच सुुरु आहे - विजय औटी, आमदार, शिवसेना
दरम्यान, 19 आमदारांना निलंबित केल्याने काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी कारवाई विरोधात मूक आंदोलन सुरू केले.