मुंबई - महानगरपालिकेतील भ्रष्टाचार आणि माफियाराजचे श्राद्ध घालण्यासाठी कावळे लागतात असा टोला भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला लगावला. सोमवारी मुंबई महानगर पालिकेमधील कार्यक्रमात प्रबोधनकार ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याच्यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली होती. की मुंबईत जसे काव काव करणारे कावळे भरपूर आहेत, तसे मुंबई महापालिकेच्या कामकाजावर बोलणारे बरेच जण आहेत. दरम्यान किरिट सोमय्या यांनी केलेल्या टीकेमुळे पुन्हा एकदा भाजपा विरूद्ध शिवसेना असा वाद पाहायला मिळणार हे मात्र नक्की.