मुंबई - राज्यातील टोल नाक्यांवर 11 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी देण्यात आलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याची घोषणा मंगळवारी केली. त्यानंतर सर्वांची एकच तारांबळ उडाली. टोलनाक्यांवर सुट्टे पैसे उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय. त्यामुळे राज्य सरकारनं टोल नाक्यांवर 11 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी घोषित केली.