मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेतृत्वाने वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड केली आहे. भाई जगताप यांना पदावरून हटवण्यात आले आहे. भाई जगताप यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पक्षाने हटवल्यानंतर भाई जगताप यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
वर्षा गायकवाड यांची काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाई जगताप म्हणाले, 'वर्षा गायकवाड मुंबई अध्यक्ष झाल्याचा मला आनंद आहे.'
आमदार वर्षा गायवाड यांची मुंबई अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार भाई जगताप यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर प्रतिक्रिया दिली.
भाई जगताप म्हणाले, वर्षा गायकवाड काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा झाल्या याचा मला आनंद आहे, महिला अध्यक्षपदी आल्याचा आनंद आहे, कृपया आमच्या भावा-बहिणींमध्ये तेढ निर्माण करू नका, ही आनंदाची बाब आहे.
हेही वाचा